शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पावसाच्या अंदाजावर पीक लागवडीचे नियोजन

By admin | Updated: May 18, 2015 01:49 IST

शेतकरी विचारात ; सोयाबीन, कपाशी या दोन्ही पिकांना प्राधान्य.

बुलडाणा : गत दोन वर्षांपासून सोयाबीन पिकावर गंडांतर येत आहे. २0१३ मध्ये अतवृष्टी तर २0१४ मध्ये विलंबाने आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. यामुळे शेतकर्‍यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. यंदाही कपाशीचे क्षेत्र वाढणार असल्याचे नियोजन कृषी विभागाने सादर केले आहे. असे असले तरी शेतकरी मात्र पावसाचा अंदाज घेऊनच पीक लागवडीचे नियोजन करणार असल्याचे संकेत आहेत. २0१३ च्या खरीप हंगामात अतवृष्टीने सोयाबीन पीक शेतकर्‍यांच्या हातचे पूर्णत: गेले. यामुळे यंदा शेतकरी सोयाबीनच्या तुलनेत कपाशीचा पेरा वाढविणार असल्याचे दिसते. या दृष्टीने कृषी विभाग व खासगी कृषी केंद्र बियाण्यांचे नियोजन करीत आहे. दोन वर्षांपासून सोयाबीनमध्ये नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यंदाचा हंगाम मात्र अर्धा सोयाबीन व अर्धी कपाशी, अशीच लागवड राहणार असल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात ३0 किलो वजनाच्या बियाण्यांचा भाव दोन हजार रुपये आहे. कंपन्यांचे बियाणे बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. मागील अतवृष्टी व खराब हवामानाचा अनुभव पाहता यंदा पावसाच्या अंदाजावरच कपाशी की सोयाबीन, या पीक लागवडीला प्राधान्य राहणार आहे. अनेक खासगी कंपन्या सोयाबीन बियाणे उगवण शक्तीची हमी देत आहे; पण प्रत्यक्षात याचा फटका शेतकर्‍यांना बसतो. खासगी विक्रेत्यांकडून काळाबाजार होणार नाही, याची विशेष खबरदारी कृषी व पं.स. विभागाला घ्यावी लागणार आहे. तसेच हंगामापूर्वी कृषी विभागाने पावसानुरूप कोणते बियाणे उपयुक्त ठरेल, याचे मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. भरारी पथकाद्वारे बोगस बियाण्यांवर लगाम लावणेही गरजेचे आहे. खरीप हंगामातील सोयाबीन व कपाशी या मुख्य पिकांची शेतकरी पावसाच्या अंदाजानुसार कमी-अधिक प्रमाणात लागवड करणार आहेत.