शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

पावसाच्या अंदाजावर पीक लागवडीचे नियोजन

By admin | Updated: May 18, 2015 01:49 IST

शेतकरी विचारात ; सोयाबीन, कपाशी या दोन्ही पिकांना प्राधान्य.

बुलडाणा : गत दोन वर्षांपासून सोयाबीन पिकावर गंडांतर येत आहे. २0१३ मध्ये अतवृष्टी तर २0१४ मध्ये विलंबाने आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. यामुळे शेतकर्‍यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. यंदाही कपाशीचे क्षेत्र वाढणार असल्याचे नियोजन कृषी विभागाने सादर केले आहे. असे असले तरी शेतकरी मात्र पावसाचा अंदाज घेऊनच पीक लागवडीचे नियोजन करणार असल्याचे संकेत आहेत. २0१३ च्या खरीप हंगामात अतवृष्टीने सोयाबीन पीक शेतकर्‍यांच्या हातचे पूर्णत: गेले. यामुळे यंदा शेतकरी सोयाबीनच्या तुलनेत कपाशीचा पेरा वाढविणार असल्याचे दिसते. या दृष्टीने कृषी विभाग व खासगी कृषी केंद्र बियाण्यांचे नियोजन करीत आहे. दोन वर्षांपासून सोयाबीनमध्ये नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यंदाचा हंगाम मात्र अर्धा सोयाबीन व अर्धी कपाशी, अशीच लागवड राहणार असल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात ३0 किलो वजनाच्या बियाण्यांचा भाव दोन हजार रुपये आहे. कंपन्यांचे बियाणे बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. मागील अतवृष्टी व खराब हवामानाचा अनुभव पाहता यंदा पावसाच्या अंदाजावरच कपाशी की सोयाबीन, या पीक लागवडीला प्राधान्य राहणार आहे. अनेक खासगी कंपन्या सोयाबीन बियाणे उगवण शक्तीची हमी देत आहे; पण प्रत्यक्षात याचा फटका शेतकर्‍यांना बसतो. खासगी विक्रेत्यांकडून काळाबाजार होणार नाही, याची विशेष खबरदारी कृषी व पं.स. विभागाला घ्यावी लागणार आहे. तसेच हंगामापूर्वी कृषी विभागाने पावसानुरूप कोणते बियाणे उपयुक्त ठरेल, याचे मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. भरारी पथकाद्वारे बोगस बियाण्यांवर लगाम लावणेही गरजेचे आहे. खरीप हंगामातील सोयाबीन व कपाशी या मुख्य पिकांची शेतकरी पावसाच्या अंदाजानुसार कमी-अधिक प्रमाणात लागवड करणार आहेत.