शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

पीक कर्ज वाटपाचे प्रशासनासमोर आव्हान; पाच वर्षात टक्केवारी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 10:50 IST

कृषी क्षेत्राला उभारी देण्याचय दृष्टीने यंदा खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ गाठण्याचे प्रशासनासोबतच बँकांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्ग आणि बिघडलेले अर्थकारण या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राला उभारी देण्याचय दृष्टीने यंदा खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ गाठण्याचे प्रशासनासोबतच बँकांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.गेल्या पाच वर्षाचा पीक कर्ज वाटपाचा आलेख पाहता सातत्याने यामध्ये घट होत असून जिल्ह्यातील तीन लाख ६२ हजार ८२५ शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप आणि तेही वेळेत करणे गरजेचे आहे. त्या तुलनेत आतापर्यंत अवघे आठ टक्केच पीक कर्ज वाटप झाले आहे. प्रत्यक्षात जिल्हतील शेतकऱ्यांना खरीप हंगामाध्ये दोन हजार ४६० कोटी ३४ लाख ८० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत पीक कर्ज वाटपासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांची संख्याही आता वाढली आहे. त्यामुळे या प्रत्येक गरजू शेतकºयाला पीक कर्ज देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.वार्षिक पतआराखड्याच्या जवळपास ७० टक्के तरतूद ही पीक कर्जासाठी केलेली आहे. मात्र प्रत्यक्षात खरीप व रब्बीच्या पीक कर्जाचे उदिष्ठ साध्य होत नसल्याचे गेल्या पाच वर्षाची आकडेवारी स्पष्ट करते. यंदा शेतकरी कर्जमाफीमुळे जवळपास तीन लाख ६२ हजार ८२५ शेतकरी पीक कर्जासाठी पात्र ठरले आहे. त्यामुळे या शेतकºयांपर्यंत पीक कर्ज वाटपाचे प्रशासनासमोर आव्हान राहणार आहे.कृषीचे अर्थचक्रही बिघडलेलेजिल्ह्यात गेल्या वर्षी वार्षिक सरासरीच्या ११४ टक्के पाऊस झाला. मात्र खरीप हंगामात हातातोंडाशी घास आल्यानंतर झालेला अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या हातून खरीपाचे पीक गेले. परतीचा पाऊस व आॅक्टोबर दरम्यान आलेल्या दोन चक्री वादळामुळे शेतकºयांच्या शेतात सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुड्याच पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्यामुळे शेतकºयांचेही अर्थचक्र बिघडलेले आहे.पाच वर्षात लाभार्थी शेतकºयांची संख्या घटतेयगेल्या पाच वर्षाचा आढावा घेतला तर जिल्ह्यात पीक कर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या तुलनेत कमी शेतकºयांना पीक कर्ज मिळाले आहे. जेथे २०१५-१६ मध्ये एक लाख ३२ हजार शेतकºयांपैकी एक लाख १५ हजार ४०३ शेतकºयांना पीक कर्ज मिळाले होते तेथे गेल्या वर्षात पात्र ठरेल्या एक लाख ९७ हजार ८६ शेतकºयांपैकी केवळ ५१ हजार १३१ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करता आले. त्यामुळे पाच वर्षात पीक कर्ज वाटपाचा आकडा ८७ टक्क्यांवरून गेल्या वर्षी २६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यातच यावर्षी पात्र शेतकºयांची संख्या साडेतीन लाखाच्यावर आहे. त्यामुळे या शेतकºयांना पीक कर्ज मिळणे गरजेचे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी