शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

१८ टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज: पालकमंत्र्यांच्या निर्देशाला खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:38 IST

३ लाख ६२ हजार शेतकºयांना कर्ज वाटपाचे लक्षांक असताना ६६ हजार शेतकºयांनाच कर्ज मिळाले आहे.

- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पीक कर्ज वाटप करण्यात दिरंगाई करणाºया बँकावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला होता. तरीही बँकांमध्ये कर्ज वाटपाची प्रक्रिया संथगतीने सुरू असून लक्षांकाच्या केवळ १८ टक्के शेतकऱ्यांनाच २९ जून पर्यंत कर्ज वाटप करण्यात आले. ३ लाख ६२ हजार शेतकºयांना कर्ज वाटपाचे लक्षांक असताना ६६ हजार शेतकºयांनाच कर्ज मिळाले आहे. त्यामुळे २ लाख ९६ हजार शेतकºयांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे.लॉकडाऊनमुळे शेतकºयांचा शेतमाल घरातच पडून आहे. त्यामुळे, शेतकºयांसमोर खरीपाची पेरणी करण्याचे आव्हान होते. शासनाने शेतकºयांना कर्जमाफी देउन दिलासा दिला. मात्र, बँकाकडून शेतकºयांना कर्ज वितरण करण्यास मोठा विलंब होत असल्याचे चित्र आहे. पेरणीसाठी पीक कर्ज मिळेल,अशी आशा असलेल्या शेतकºयांनी बँकाकडे अर्ज केले. मात्र, विविध दाखल्यांसाठी बँकाकडून अडवणुक होत असल्याने अनेक शेतकरी अजुनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.पीक कर्ज वाटपाची गती संथ असल्याने पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठक घेउन बँकांना तातडीने पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले होते. तसेच पीक कर्ज वाटपात दिंरगाई करणाºया बँकाविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तरीही बँकांची पीक कर्ज वाटपाची गती वाढली नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात एक लाख ३० हजार शेतकरी पीक कर्जासाठी पात्र आहेत. यापैकी २९ जून पर्यंत बँकांनी ६६ हजार शेतकºयांना ५२३ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. अजुनही ६४ हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. अर्ध्यापेक्षा अधीक शेतकºयांना कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.मृग नक्षत्रात जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी पेरणी केल्यानंतर दहा ते बारा दिवस पावसाने दांडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. अनेकांचे सोयाबीन न निघाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पैशांची गरज असताना बँकाकडून पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे.लक्ष्यांक दूरचयावर्षी जिल्ह्यातील बँकांना तीन लाख ६२ हजार शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ६६ हजार शेतकºयांनाच पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. २ लाख ९४ हजार शेतकºयांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात २४६० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य आहे. त्यापैकी ५२३ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.प्रत्येक शेतकºयाला कर्ज वाटप करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. पात्र ठरलेल्या ५१ टक्के शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच उर्वरीत शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वच शेतकºयांना पीक कर्ज मिळावे,यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- उत्तम मनवर, व्यवस्थापक,अग्रणी बँक, बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी