शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

१८ टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज: पालकमंत्र्यांच्या निर्देशाला खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:38 IST

३ लाख ६२ हजार शेतकºयांना कर्ज वाटपाचे लक्षांक असताना ६६ हजार शेतकºयांनाच कर्ज मिळाले आहे.

- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पीक कर्ज वाटप करण्यात दिरंगाई करणाºया बँकावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला होता. तरीही बँकांमध्ये कर्ज वाटपाची प्रक्रिया संथगतीने सुरू असून लक्षांकाच्या केवळ १८ टक्के शेतकऱ्यांनाच २९ जून पर्यंत कर्ज वाटप करण्यात आले. ३ लाख ६२ हजार शेतकºयांना कर्ज वाटपाचे लक्षांक असताना ६६ हजार शेतकºयांनाच कर्ज मिळाले आहे. त्यामुळे २ लाख ९६ हजार शेतकºयांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे.लॉकडाऊनमुळे शेतकºयांचा शेतमाल घरातच पडून आहे. त्यामुळे, शेतकºयांसमोर खरीपाची पेरणी करण्याचे आव्हान होते. शासनाने शेतकºयांना कर्जमाफी देउन दिलासा दिला. मात्र, बँकाकडून शेतकºयांना कर्ज वितरण करण्यास मोठा विलंब होत असल्याचे चित्र आहे. पेरणीसाठी पीक कर्ज मिळेल,अशी आशा असलेल्या शेतकºयांनी बँकाकडे अर्ज केले. मात्र, विविध दाखल्यांसाठी बँकाकडून अडवणुक होत असल्याने अनेक शेतकरी अजुनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.पीक कर्ज वाटपाची गती संथ असल्याने पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठक घेउन बँकांना तातडीने पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले होते. तसेच पीक कर्ज वाटपात दिंरगाई करणाºया बँकाविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तरीही बँकांची पीक कर्ज वाटपाची गती वाढली नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात एक लाख ३० हजार शेतकरी पीक कर्जासाठी पात्र आहेत. यापैकी २९ जून पर्यंत बँकांनी ६६ हजार शेतकºयांना ५२३ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. अजुनही ६४ हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. अर्ध्यापेक्षा अधीक शेतकºयांना कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.मृग नक्षत्रात जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी पेरणी केल्यानंतर दहा ते बारा दिवस पावसाने दांडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. अनेकांचे सोयाबीन न निघाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पैशांची गरज असताना बँकाकडून पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे.लक्ष्यांक दूरचयावर्षी जिल्ह्यातील बँकांना तीन लाख ६२ हजार शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ६६ हजार शेतकºयांनाच पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. २ लाख ९४ हजार शेतकºयांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात २४६० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य आहे. त्यापैकी ५२३ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.प्रत्येक शेतकºयाला कर्ज वाटप करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. पात्र ठरलेल्या ५१ टक्के शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच उर्वरीत शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वच शेतकºयांना पीक कर्ज मिळावे,यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- उत्तम मनवर, व्यवस्थापक,अग्रणी बँक, बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी