शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

पिकांचे अतोनात नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:39 IST

नांदुरा: नांदुरा तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी  वार्‍यासह झालेल्या पावसामुळे कपाशी, मका, ज्वारीसह  अन्य पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये काटी,  धानोरा, विटाळी, सिरसोडी, बुर्टी, डिर्घी, चांदूर शिवारातील  पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. 

ठळक मुद्देवादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे पिके जमीनदोस्तचार गावे सोळा तास अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: नांदुरा तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी  वार्‍यासह झालेल्या पावसामुळे कपाशी, मका, ज्वारीसह  अन्य पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये काटी,  धानोरा, विटाळी, सिरसोडी, बुर्टी, डिर्घी, चांदूर शिवारातील  पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.  तालुक्यात बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी  लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असले तरी  काही गावात वादळी वार्‍यामुळे जवळपास सर्वच पिकांचे  मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बागायती कपाशीची  कापूस फुटण्याची अवस्था असून, मक्याचे कणीस भरलेले  आहेत, ज्वारीलाही कणसे पडलेली आहेत. त्यामुळे  अचानक आलेल्या वादळी वार्‍यामुळे ही सर्व पिके  जमीनदोस्त झाली आहेत. परिसरातील काटी, धानोरा,  विटाळी, सिरसोडी, बुर्टी, चांदूर, डिघी येथे मोठय़ा प्रमाणात  पिकांचे नुकसान झाले आहे.काटी येथील जवळपास ८0 टक्के शेतकर्‍यांचे कपाशी,  ज्वारी व मका पिके जमिनीवर आडवी झाल्याने शेतकर्‍यांचा  हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, पिकांची  अशी अवस्था पाहून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. 

चार गावे सोळा तास अंधारातबुधवारी सायंकाळी आलेल्या पावसामुळे रात्री ८ वाजेपासून  काटी, धानोरा, विटाळी, सिरसोडी चारही गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तब्बल १६ तास वीज गायब हो ती. गुरुवारी दुपारी १२ वाजता वीजपुरवठा पूर्ववत सुरू  झाला. १६ तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिल्याने चारही  गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.  त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

बुधवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे  दोन एकरावरील मका व ३ एकरावरील कपाशी पूर्णपणे  उद्ध्वस्त झाली असून, हाती आलेले पीक गेले आहे. यामध्ये  मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आता पुढे काय, असा  प्रश्न आहेच.- विष्णू त्र्यंबक हिवाळे, शेतकरी काटी

काटी, धानोरा, विटाळी, सिरसोडी येथील शेतकर्‍यांचे मोठे  आर्थिक नुकसान झाले असून, महसूल विभाग, कृषी  विभागाने तत्काळ नुकसानीचा सर्व्हे करून शेतकर्‍यांना  नुकसान भरपाई द्यावी.- योगिता गावंडे, पं.स. सदस्य