शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान, शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:33 IST

दुसरबीड : सततच्या पावसामुळे पिके चांगल्या स्थितीत आहेत़ मात्र, गत काही दिवसांपासून वन्य प्राणी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान ...

दुसरबीड : सततच्या पावसामुळे पिके चांगल्या स्थितीत आहेत़ मात्र, गत काही दिवसांपासून वन्य प्राणी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी दुसरबीड परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे़

दुसरबीड परिसरात शेतकऱ्यांनी साेयाबीन, कपाशी, मूग व इतर पिकांची पेरणी केली आहे़ सध्या पिके चांगल्या स्थितीत आहेत़ मात्र, गत काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा हैदाेस वाढला आहे़ वन्य प्राण्यांचे कळप शेतात शिरून पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत़ राेही, रानडुक्कर आदी प्राण्यांचा परिसरात माेठ्या प्रमाणात वावर वाढला आहे़ त्यामुळे, शेतकऱ्यांना रात्री जागल करून पिके वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे़ पिकांचे नुकसान झाल्यानंतर अनेक शेतकरी वनविभागाकडे तक्रार करतात़ मात्र, वनविभागाकडून ताेकडी मदत मिळते़ त्यातही पंचनामा करण्यासही बराच विलंब हाेताे. त्यामुळे मदत वाढवून देण्याची मागणी हाेत आहे़ तसेच वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची गरज आहे़

उभ्या पिकाचे राेही, हरिण, रानडुक्कर माेठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत़ राेहींच्या २० ते २५चा कळप शेतात शिरून नुकसान करीत आहेत़ वन्य प्राण्यांकडून हाेणाऱ्या नुकसानाचा माेबदला अल्प मिळताे़ त्यामुळे, वनविभागाने माेबदला वाढवण्याची तर वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची गरज आहे़

- शेख आरिफ शेख सत्तार, शेतकरी, दुसरबीड

माेठ्या प्रमाणात नुकसान हाेऊनही वनविभागाकडून पंचनामे करण्यास विलंब करण्यात येताे़ तसेच मिळणारी मदतही ताेकडी असते़ वन्य प्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागल करावी लागते़ वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करून नुकसानभरपाईत वाढ करण्याची गरज आहे़ शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास काँग्रेसच्या वतीने आंदाेलन करण्यात येईल़

- शेख रहमान, काँग्रेस नेते