शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

‘भाग्यश्री’ च्या वाटेत निकषांचा अडसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:14 IST

गतवर्षी या योजनेसाठी जिल्ह्यात केवळ ४२ लाभार्थी पात्र ठरले. योजनेसाठीचे निकष 'भाग्यश्री'च्या वाटेत अडसर ठरत असल्याचे दिसून येत आहे.

- सोहम घाडगे   लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासकिय योजना म्हटले की, लाभासाठी अर्जांचा खच पडतो. कुणाची निवड करावी हे ठरवितांना प्रशासनाच्या नाकी नऊ येतात. मात्र 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेच्या बाबतीत याउलट चित्र आहे. गतवर्षी या योजनेसाठी जिल्ह्यात केवळ ४२ लाभार्थी पात्र ठरले. योजनेसाठीचे निकष 'भाग्यश्री'च्या वाटेत अडसर ठरत असल्याचे दिसून येत आहे.मागील दोन वर्षांपासून शासनाने 'माझी कन्या भाग्यश्री' योजना अंमलात आणली. स्त्रीभ्रूण हत्या थांबवून मुलींचा जन्मदर वाढावा हा या योजनेचा उद्देश आहे. आॅगस्ट २०१७ व त्यानंतर जन्मलेल्या मुलीच्या नावे बँकेत ५० हजार रुपये मुदतठेव म्हणून गुंतविण्यात येते. तर दोन मुली असल्यास प्रत्येकीच्या नावे २५ हजार रुपये गुंतविण्यात येतात. एक मुलगी किंवा २ मुली असलेल्या महिलेने किंवा कुटूंब प्रमुखाने नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षाच्या आत ही शस्त्रक्रिया केलेली पाहिजे. अशी पात्रता पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.एक किंवा दोन अपत्ये असणारी अनेक कुटूंब आपल्याकडे आहेत. परंतू त्यांनी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असतेच असे नाही. बºयाचदा माता-पित्यापैकी एकाने शस्त्रक्रिया केलेलीही असते. परंतू मुलगी जन्मल्यानंतर दोन वर्षापेक्षा जास्त कालवधीनंतर ही शस्त्रक्रिया झालेली असते. त्यामुळे ते दाम्पत्य या योजनेसाठी पात्र ठरत नाही. अशा कारणांमुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी असल्याचे दिसत आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून योजनेची जनजागृती करण्याची गरज आहे.जनजागृतीच्या माध्यमातून योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ करून घेण्यास मदत होईल.

भाग्यश्री योजनेचे २०१७- १८ मध्ये १४ लाभार्थी होते. तर २०१८-१९ मध्ये हा आकडा ४२ आहे. भविष्यात यामध्ये आणखी वाढ होईल, यादृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे.- अरविंद रामरामेजिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण जि. प. बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना