शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

‘भाग्यश्री’ च्या वाटेत निकषांचा अडसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:14 IST

गतवर्षी या योजनेसाठी जिल्ह्यात केवळ ४२ लाभार्थी पात्र ठरले. योजनेसाठीचे निकष 'भाग्यश्री'च्या वाटेत अडसर ठरत असल्याचे दिसून येत आहे.

- सोहम घाडगे   लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासकिय योजना म्हटले की, लाभासाठी अर्जांचा खच पडतो. कुणाची निवड करावी हे ठरवितांना प्रशासनाच्या नाकी नऊ येतात. मात्र 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेच्या बाबतीत याउलट चित्र आहे. गतवर्षी या योजनेसाठी जिल्ह्यात केवळ ४२ लाभार्थी पात्र ठरले. योजनेसाठीचे निकष 'भाग्यश्री'च्या वाटेत अडसर ठरत असल्याचे दिसून येत आहे.मागील दोन वर्षांपासून शासनाने 'माझी कन्या भाग्यश्री' योजना अंमलात आणली. स्त्रीभ्रूण हत्या थांबवून मुलींचा जन्मदर वाढावा हा या योजनेचा उद्देश आहे. आॅगस्ट २०१७ व त्यानंतर जन्मलेल्या मुलीच्या नावे बँकेत ५० हजार रुपये मुदतठेव म्हणून गुंतविण्यात येते. तर दोन मुली असल्यास प्रत्येकीच्या नावे २५ हजार रुपये गुंतविण्यात येतात. एक मुलगी किंवा २ मुली असलेल्या महिलेने किंवा कुटूंब प्रमुखाने नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षाच्या आत ही शस्त्रक्रिया केलेली पाहिजे. अशी पात्रता पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.एक किंवा दोन अपत्ये असणारी अनेक कुटूंब आपल्याकडे आहेत. परंतू त्यांनी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असतेच असे नाही. बºयाचदा माता-पित्यापैकी एकाने शस्त्रक्रिया केलेलीही असते. परंतू मुलगी जन्मल्यानंतर दोन वर्षापेक्षा जास्त कालवधीनंतर ही शस्त्रक्रिया झालेली असते. त्यामुळे ते दाम्पत्य या योजनेसाठी पात्र ठरत नाही. अशा कारणांमुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी असल्याचे दिसत आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून योजनेची जनजागृती करण्याची गरज आहे.जनजागृतीच्या माध्यमातून योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ करून घेण्यास मदत होईल.

भाग्यश्री योजनेचे २०१७- १८ मध्ये १४ लाभार्थी होते. तर २०१८-१९ मध्ये हा आकडा ४२ आहे. भविष्यात यामध्ये आणखी वाढ होईल, यादृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे.- अरविंद रामरामेजिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण जि. प. बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना