शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नवीन उपविभागाची निर्मिती करावी!

By admin | Updated: May 1, 2017 00:59 IST

श्वेता महाले यांची ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

चिखली : लव्हाळा येथे १३२/३३ के.व्ही. उपकेंद्राची निर्मिती करण्यात यावी, तसेच चिखली उपविभागाचे विभाजन करून नवीन उपविभागाच्या निर्मितीसह पेठ व चिखली-२ शाखा कार्यालयाची सुद्धा निर्मिती करण्याची मागणी जि.प. महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले पाटील यांनी ऊर्जा मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बुलडाणा विभागांतर्गत चिखली उपविभागीय कार्यालय आहे. या विभागामध्ये ३३/११ के.व्ही. चे ४ उपकेंद्र आहेत, तर नवीन २ उपकेंद्र मंजूर आहेत व नवीन ४ उपकेंद्र प्रस्तावित आहेत. ११ के.व्ही.च्या एकूण ४६ वीज वाहिन्या आहेत. त्यातील २४ स्वतंत्र कृषी वीज वाहिन्या आहेत. या विभागात जवळपास १ हजार ७०० रोहित्र आहेत. तसेच उच्चदाब व मंजूर वाहिन्यांचे ४००० कि.मी.चे जाळे चिखली तालुक्यात पसरलेले असून, ग्राहक संख्या ६१ हजारांच्या वर आहे. १५०० च्यावर कृषी पंप ग्राहकांचे कामे सुरू असून, त्यामुळे ग्राहक संख्येत भर पडणार आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत असल्याने ग्राहकांना सेवा देण्यात अडथळा येत आहे. बुलडाणा जिल्हात चिखली सर्वात मोठा तालुका आहे. त्यामुळे चिखली उपविभाग तसेच चिखली शहर शाखा कार्यालयाचे विभाजन करून उन्द्री उपविभागची आणि नवीन पेठ व चिखली- २ शाखा या कार्यालयाची निर्मिती करणे गरजेचे असून, त्यामुळे वीज वाहिनी देखभाल व दुरुस्तीची कामे क्षेत्रीय आणि बिलिंगच्या कामावर नियंत्रण ठेवता येईल. लव्हाळा येथे १३२/३३ के.व्ही सबस्टेशन उभारल्याने चिखली तालुक्यातील जवळपास ६७ गावांना व ०२-३३/११ के.व्ही सबस्टेशनला वीज पुरवठा सुरळीत होईल व शासनाच्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांना अखंडित सुरळीत वीज पुरवठा देणे शक्य होणार आहे. तसेच लव्हाळा येथे १३२ के.व्ही उपकेंद्र झाल्यास चिखली तालुका व मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. चिखली २२० के.व्ही सबस्टेशनमधून निघणाऱ्या दुसरबिड व एकलारा ३३ के.व्ही. वाहिनीवर सिजनमध्ये ओव्हरलोड येत असल्याने शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत मिळत नाही. चिखली शहरात सद्यस्थितीत १३ हजार ६०० वीज ग्राहक असून, एकच वितरण कार्यालय अस्तित्वात आहे. या ग्राहक संख्येनुसार दोन वितरण केंद्राची आवश्यकता आहे. जेणेकरून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण व ग्राहक सेवा तत्पर देणे शक्य होईल. चिखली उपविभागीय केंद्रामध्ये ३३/११ के.व्ही.चे ९ उपकेंद्र आहेत. नवीन २ उपकेंद्र मंजूर आहेत, तर ४ उपकेंद्र प्रस्तावित आहेत; परंतु या सर्व केंद्रांना पुरवठा करणार २२०/१३२ के.व्ही.चे उपकेंद्र चिखली येथे आहे. त्या उपकेंद्रावर ३३/११ के.व्ही उपकेंद्राना पुरवठा करणाऱ्या अतिभारी आहेत. त्यामुळे नवीन मंजूर तसेच नवीन प्रस्तावित ३३/११ के.व्ही उपकेंद्राना पुरवठा करणाऱ्या वाहिन्या व त्याची क्षमता अपुरी पडत आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास येत्या काळात विजेची समस्य उग्र रूप धारण करू शकते. त्यामुळे लव्हाळा येथे १३२/३३ के.व्ही. उपकेंद्रांची निर्मिती करण्यात यावी व चिखली उपविभागचे विभाजन करून नवीन उपविभागाच्या निर्मितीसह पेठ व चिखली-२ शाखा कार्यालयाची सुध्दा निर्मिती करण्याची मागणी जि.प.महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले पाटील यांनी ऊर्जा मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्हा दौऱ्यादरम्यान केली. दरम्यान ना. बावनकुळे यांनी या निवेदनाची दखल घेत सदर उपकेंद्राचे प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविण्याचे सांगितले आहे.