शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

देशात आणि राज्यात ‘विकृत’ सत्तेत : प्रा. ज्ञानेश वाकुडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:25 IST

खामगाव: केंद्रासह राज्यात सत्तेत असलेल्यांनी जनतेची ओरबडणूक चालविली असून, संघटीत धोकेबाजी करीत शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या भावनांशी खेळणारे सत्ताधारी टपोरी आणि विकृत असल्याचा सणसणाटी आरोप लोकजागर इंडियाचे प्रणेते   प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे केला.

ठळक मुद्देलोकजागर इंडिया विधानसभेच्या २८८ जागा लढविणार!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: केंद्रासह राज्यात सत्तेत असलेल्यांनी जनतेची ओरबडणूक चालविली असून, संघटीत धोकेबाजी करीत शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या भावनांशी खेळणारे सत्ताधारी टपोरी आणि विकृत असल्याचा सणसणाटी आरोप लोकजागर इंडियाचे प्रणेते  प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे केला.खामगाव येथील पत्रकार भवनात आयोजित पत्र परिषदेत गुरुवारी ११ जानेवारी रोजी  प्रा. वाकुडकर यांनी लोकजागर इंडियाची भूमिका स्पष्ट केली. केंद्र आणि राज्य शासनावर सडकून टीका करताना ते म्हणाले की, देशात आणि राज्यात पूर्वी काँग्रेसच्या -राष्ट्रवादीच्या माध्यमातून  भ्रष्ट आणि बेफिकीरांचे राज्य होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळलेल्या जनतेने पर्याय म्हणून मोदी-फडणवीस म्हणजेच भाजपला निवडूण दिले. मात्र, भाजपने शेतकरी, कष्टकरी आणि जनतेचा भ्रमनिराश केला आहे. मोदी सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला छुपा अतिरेकी अंजेडा उघडपणे राबविला आहे. परिणामी, मोदींमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फार मोठे नुकसानही झाले आहे. शेतकरी, कष्टकर्‍यांसोबतच ओबीसी विद्यार्थीही शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आले असल्याचेही वाकुडकर म्हणाले.  यावेळी सध्या सत्ताधरी पक्षाच्या काही चुकीच्या धोरणांचाही त्यांनी उहापोह केला.यावेळी लोकजागर इंडियाचे महासचिव महादेव मिरगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  

झिरो बजेट लोकशाहीची संकल्पना साकारणार!काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-सेनेला नवा पर्याय म्हणून लोकजागर इंडियाच्या माध्यमातून तिसरा पर्याय उभा करण्याचे आपले प्रयत्न आहेत. यामध्ये विद्याथी, युवक, महिला आणि बुद्धीजीवींना उमेदवारी देत, आगामी विधानसभेच्या सर्वच २८८ जागांवर लोकजागर इंडियाचे उमेदवार उभे केले जातील. राज्यात लोकजागर इंडियाच्या माध्यमातून टप्प्या-टप्प्याने  सात कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये झीरो बजेट लोकशाही आणि गाव तिथे उद्योग ही दोन कलमं त्यांनी गुरुवारी जाहीर केली. तर उर्वरीत पाच कलमे एप्रिलपर्यंत जाहीर करणार असल्याचे प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :khamgaonखामगाव