शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा तालुक्यात कपाशीच्या सर्वेक्षणासाठी शेतकरी अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:40 IST

सिंदखेडराजा: तालुक्यात सर्वाधिक पेरा हा कपाशीचा असून, यावर्षी बोंडअळीच्या हल्ल्यात हजारो हेक्टरवरील कपाशी गळून पडली आहे. या कपाशीचा सर्वेक्षण करण्याचा आदेश शासनाने दिला असून, पटवारी आणि कृषी सहायक थेट बांधावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा धाब्यावर बसून अहवाल तयार करीत आहेत. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकरी नुकसानाचे सर्वेक्षण करणार्‍या अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत आहेत. 

ठळक मुद्देबांधावर जाऊन पाहणी न करता धाब्यावर बसून अहवाल 

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तालुक्यात सर्वाधिक पेरा हा कपाशीचा असून, यावर्षी बोंडअळीच्या हल्ल्यात हजारो हेक्टरवरील कपाशी गळून पडली आहे. या कपाशीचा सर्वेक्षण करण्याचा आदेश शासनाने दिला असून, पटवारी आणि कृषी सहायक थेट बांधावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा धाब्यावर बसून अहवाल तयार करीत आहेत. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकरी नुकसानाचे सर्वेक्षण करणार्‍या अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात सोयाबीननंतर कपाशी हे मुख्य पीक शेतकरी मोठय़ा प्रमाणात घेतात. कधी खोड अळी तर कधी बोंडअळीने कपाशीचे पीक फस्त होते. लाल्यावर संपूर्ण शेतच फस्त होते. कपाशीवर दरवर्षी कोणते ना कोणते संकट ठरलेले असतेच. यावर्षी कपाशीला पेरणीयोग्य पाऊस पडला. रोपटीही चांगल्याप्रकारे बहरली होती. फुलही मोठय़ा प्रमाणात आली. पहिली वेचणी झाली आणि उर्वरित बोंडात बोंडअळीने प्रवेश केला. एक-एक करीत शेतात कापसाऐवजी बोंडीची गळती सुरू झाली आणि अवघ्या १५ दिवसात कपाशीला फक्त पानेच शिल्लक राहिली. २५ हजार हेक्टरवर ही संक्रांत आल्याने शेतकर्‍यांच्या उत्पादनाचा मार्गच खुंटला. कपाशीच्या पेरणीनंतर ९0 दिवसांनी बोंडअळी पडते, असे कृषी अधिकारी कंपनीच्या पत्रकांवरून सांगत असले तरी कपाशीला मुळात फुले लागतात आणि नंतर फळधारणा होते. कपाशी फुलायला १0 ते १५ दिवस, त्यानंतर येणारी फुले, फळे असा एकूण जून ते डिसेंबर हा सहा महिन्याचा कालावधी लागतो. ओलीत कपाशीला आठ महिनेही लागतात. यावर्षी मात्र बोंडअळीने संपूर्ण क्षेत्रच व्यापल्याने झडती ५0 टक्केपेक्षा कमी झाली आहे. आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शेतकर्‍यांची बाजू मांडत संपूर्ण कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन सर्वेक्षण करण्याची मागणी केली आणि त्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून विधिमंडळातही प्रश्न उपस्थित केला.शासनाच्या आदेशानुसार सात भागात टीम तयार करून पटवारी, कृषी सहायकांना बांधावर जाऊन नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे आदेश तहसीलदार संतोष कणसे यांनी दिले. काही पटवारी बांधावर जाऊन अहवाल तयार करीत आहेत तर काही कृषी सहायक आणि पटवारी राजकीय पुढार्‍यांना हाताशी धरून धाब्यावर बसून अहवाल तयार करीत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे ज्यांच्या शेतात कपाशीची बोंडही नाही अशा बड्या शेतकर्‍यांची नावे नुकसानग्रस्त यादीत येण्याची शक्यता बळावली आहे. धाब्यावर बसून सर्वेक्षण करणार्‍या कर्मचार्‍यांना समज देऊन वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याची मागणी दिलीप आश्रू इंगळे, प्रल्हाद खरात यासह शेकडो शेतकर्‍यांनी केली आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडाcottonकापूस