शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

CoronaVirus :  बुलडाणा जिल्ह्यात ७२ हजार नागरिक परतले; चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 10:47 IST

परतणाऱ्या या नागरिकांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढण्यासोबतच जिल्ह्यात संक्रमणाचा धोका गडद होत असून चिंतेतही भर पडतेय.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : परदेशासह मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात तब्बल ७२ हजार ३९६ नागरिक गेल्या काही दिवसात दाखल झाले असून १४७ व्यक्तींमध्ये सर्दी, ताप व खोकल्याची लक्षणे आढळून आली आहे. सातत्याने स्वगृही परतणाऱ्या या नागरिकांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढण्यासोबतच जिल्ह्यात संक्रमणाचा धोका गडद होत असून चिंतेतही भर पडतेय.नागरिकांचे हे स्वगृही सुरू झालेले स्थलांतर पाहता ग्रीन झोनकडे वाटचाल करणाºया बुलडाणा जिल्ह्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. नरवेल आणि मलकापूर पांग्रा येथील दोन्ही प्रकरणे त्याचे जिवंत उदाहरण आहेत.दुसरीकडे शासकीय स्तरावर अधिकृत आकडेवारी ही ७२ हजार ३९६ च्या आसपास असली तरी अनधिकृतरित्या अनेक नागरिक जिल्ह्यात दाखल होत असून जवळपास दीड लाखांच्या घरात हा आकडा जाऊ शकतो, असे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीत कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढत असल्याची भावना निर्माण होत आहे. आज घडीला जवळपास ८०० च्या आसपास प्रत्यक्षात कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात येत असून ७५० च्या आसपास प्रत्यक्षात स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत.

जिल्ह्यात दाखल झालेल्या ७२ हजार ३९६ नागरिकांपैकी ७२ हजार १५५ नागरिकांच्या हातावर क्वारंटीनचे शिक्के मारण्यात आले असून त्यांना होम क्वारंटीन राहण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. २२९ नागरिकांची मात्र तपासणी होऊ शकली नाही. विशेष म्हणे शेगाव तालुक्यातील या नागरिकांची तपासणी राहलेली आहे. जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींमध्ये दाखल होणाºया नागरिकांची ही संख्या असून शहरी भागातील संख्या ही वेगळी आहे. गेल्या दहा दिवसातच जवळपास २२ हजार व्यक्ती स्वगृही परतल्याचा अंदाज आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात ३९ हजार नागरिक स्वगृही परतले होते. त्यामुळे आता आणखी काही नागरिक हे जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा