शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोना : बुलडाणा जिल्ह्यात दोन मृत्यूची लपवाछपवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 10:40 IST

दोन मृत्युची माहिती लपविण्यात आली असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात सातत्याने वाढत असतानाच दर दिवशी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे तर १३ दिवसा आड एकाचा मृत्यू होत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोना मृत्यूचे आकडे लपविल्या जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी सरकारचा हवाला देत बुधवारी ेक टिष्ट्वट केले. त्यानुसारदोन मृत्युची माहिती लपविण्यात आली असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपाने आरोग्य यंत्रणा अडणीत आली होती. दरम्यान, शासनानेच कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची सुधारीत यादी प्रसिद्ध केल्यावर त्यामध्ये वाढलेल्या मृतकांचा आकडा हा लपविलेला होता असा दावा करती फणवीस यांनी पुन्हा नवीन आकडेवारी टिष्ट्वट केल्याने सध्या आकड्यांचा खेळ रंगला आहे.जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर यांच्या मार्गदर्शनानुसार, राज्यातील प्रत्येक प्रत्येक मृत्युची समीक्षा करण्यासाठी डेथ आॅडीट समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला जिल्हास्तरावर रुग्णांच्या मृत्युचे आॅडीट सात दिवसांच्या आत करणे अनिवार्य आहे. त्यामध्ये रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचा सविस्तर शोध घेणे, मृत्युच्या तत्कालीन कारण कोवीड १९- नसल्यास तसे नमूद करणे आवश्यक आहे, अशा रुग्णंचा कोवीडमुळे झाल्याचे गृहीत धरण्यात येणार नसल्याचे म्हंटले आहे. तमुळे प्रशासननाने फेर तपासणीच्या नावाखाली आकड्यांमध्ये बदल केल्याचा आरोपही त्यांनी टिष्ट्वटच्या माध्यमातून केला.राज्य सरकारचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या या यादीमध्ये बुलडामा जिल्ह्यातील दोन मृत्यू लपविण्यात आल्याचे सांगितले आहे. यामुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे.प्रकरणी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांना विचारणा केली असता बुलडाण्यातील तीन मृत्यूंची डेथ समरी ही अगोदर सादर करण्यात आली होती. सोबतच ११ आणि १४ जून रोजी झालेल्या मृत्यू प्रकरणांची एकंदरीत समरी दाखल होण्यास विलंब लागला. साधारणत: १५ दिवसाच्या आत ही समरी सादर करावी लागते. मलकापूरमधील ११ व १४ जून रोजी झालेल्या मृत्यू प्रकरणांची समरी ही १७ जून रोजी दाखल करण्यात आलेली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूच्या संख्येत त्यांचा समावेश होईल. कधी कधी एखादा मृतक हा बुलडाणा जिल्ह्यातील असला तरी तो अन्य जिल्ह्यात दगावलेला असतो. प्रशासकीय पातळीवर त्याबाबत अधिकृत माहिती मिळण्यास विलंब होतो व त्यामुळे संख्यात्मक फरक प्रसंगी पडतो. डिटेल इन्फॉर्मेशन मिळण्यास विलंब झाल्यामुळेही असे प्रकार घडतात, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, १७ जून रोजीही रोहीणखेड येथील एकाचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यूजिल्ह्यातून जून महिन्यात चार दिवसांच्या अंतराने मलकापूरमधील दोन व्यक्तींचा कोरोना संसर्गाने मृत्यू झालेला आहे तर रोहीणखेड येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा १७ जून रोजी मृत्यू झाला आहे. यापूर्वी जळगाव जामोद, खामगाव आणि बुलडाणा येथील प्रत्येकी एकाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या आता सहा झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा आता दीडशेच्या उंबरठ्यावर येवून पोहोचला आहे.

जिल्हत सहा जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. १७ जून रोजी एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ११ आणि १४ जून रोजीच्या मृत्युची समरी १७ जून रोजी सबमीट करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण मृत्यूसंख्येत त्याची नोंद होईल. मृत्यू समरी सादर करण्यास १५ दिवस लागतात. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत थेट डेथ रिपोर्ट सहा झालेले आहेत.- सुमन चंद्राजिल्हाधिकारी, बुलडाणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा