शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
3
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
4
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
5
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
6
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
7
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
8
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
9
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

कोरोना पीडितांची भूक भागवायला सरसावला सुहृदयी तरुण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:31 IST

चिखली : कोरोनामुळे उद्भवलेल्या सध्याच्या संकटकाळात प्रत्येकाने माणुसकी जपायला हवी, असा संदेश दिल्या जात आहे. याच माणुसकीच्या नात्याने सर्वांना ...

चिखली : कोरोनामुळे उद्भवलेल्या सध्याच्या संकटकाळात प्रत्येकाने माणुसकी जपायला हवी, असा संदेश दिल्या जात आहे. याच माणुसकीच्या नात्याने सर्वांना मदत करण्याची इच्छा बाळगून असलेल्या येथील सुहृदयी तरुण गजू तारू यांनी योग्य आपल्या ''''जेएमडी परिवार'''' या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था नसलेल्या काेरोना बाधित रुग्ण व त्यांच्या संपूर्ण कुटुंबास घरपोच मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत शहर व परिसरात दररोज सुमारे शंभरावर जेवणाचे डबे पुरविण्यात येत आहेत.

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक लोकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वी एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्या व्यक्तीला जेवणाचा डबा देण्यासाठी असंख्य नातेवाईक, मित्रपरिवार धावून जात असत. प्रामुख्याने दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाना डबा घेऊन येऊ का किंवा डबा घेऊन येतो, असे विचारणे व त्यांना डबा पोहविणे, प्रत्यक्ष भेटून आस्थेवाईकपणे चौकशी करणे. या बाबी सर्वसाधारणपणे घडत असत. मात्र, कोरोनाने या सर्व बाबीला आडकाठी आणली असल्याने माणुसकी विसरू नका, असा संदेश प्रामुख्याने सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र, अशा वातावरणात गजानन तारू यांनी कोरोनापीडितांना घरगुती जेवणाचा डबा मोफत देण्याचा उपक्रम गेल्या आठवडाभरापासून सुरू केला आहे. ज्या घरात कोरोनाचे रुग्ण आहेत किंवा जे स्वत: बाधित आहेत आणि ज्यांची जेवणाची व्यवस्था होऊ शकत नाही, अशा नागरिकांना घरपोच जेवणाचे डबे पोचविण्याचे काम तारू आपल्या ''''जय माता दी'''' परिवाराच्या माध्यमातून करीत आहेत. संकटकाळात कायम धावून जाणाऱ्या गजू तारू यांनी यांनी कठीण काळातदेखील मदतीचा योग्य मार्ग निवडून स्वखर्चातून ही सेवा पुरवित असल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गरजूंनी नि:संकोचपणे संपर्क साधावा !

गजू तारू आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने घरीच सात्त्विक भोजन तयार करून करून घेत आहेत. एखाद्या व्यक्तीने फोन केल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरी शे. यासीन व राहुल सुरडकर यांच्याव्दारे घरपोच डबा दिला जात आहे. याअंतर्गत दररोज सकाळ-संध्याकाळ सुमारे १०० डबे घरपोच पोहचविण्यात येत आहेत. दरम्यान, गरजूंनी नि:संकोचपणे संपर्क साधावा, असे आवाहन गजू तारू यांनी केले आहे.