शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

जिगाव प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी अविरत संघर्ष - संचेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:51 IST

सिंचनासाठी आवश्यक असलेला जिगाव प्रकल्प लवकर पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन व त्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी मागील दहा वर्षांपासून नव्हे दशकापासून संघर्ष सुरू आहे. जोपर्यंत जिगाव प्रकल्पातील पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचत नाही  तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी दिली. 

ठळक मुद्देजिगावसह लघू प्रकल्पाच्या कामास प्रारंभ मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री गडकरी उपस्थित 

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: सिंचनासाठी आवश्यक असलेला जिगाव प्रकल्प लवकर पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन व त्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी मागील दहा वर्षांपासून नव्हे दशकापासून संघर्ष सुरू आहे. जोपर्यंत जिगाव प्रकल्पातील पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचत नाही  तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी दिली. आमदार चैनसुख संचेती हे रविवारी  १७ डिसेंबरला स्थानिक कोठारी विद्यालयाच्या  बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या प्रारंभ कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार अँड. आकाश फुंडकर, आमदार शशिकांत खेडेकर, आमदार संजय रायमुलकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे, नगराध्यक्षा रजनी जवरे, मेहकर विधानसभा भाजपा नेते प्रा. प्रकाश गवई, जिल्हा परिषद सभापती श्‍वेता महाले, पंचायत समिती सभापती अर्चना पाटील,  राहुल संचेती (भाजप अध्यक्ष), मलकापूर, सुधिर मुर्‍हेकर (शहर अध्यक्ष भाजपा), धृपतराव सावळे (जिल्हाध्यक्ष भाजपा) आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्मृतिचिन्ह व पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक़्रमाचे प्रास्ताविक  आय.एस. चहल (प्रधान सचिव जलसंपदा) यांनी केले तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे ढगे यांनी प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाची माहिती दिली. आमदार चैनसुख संचेती यांनी त्यांच्या मार्गदर्शनात रखडलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम व त्याकरिता केलेला संघर्ष याची माहिती देऊन जिगाव प्रकल्पाला रेल्वे उड्डाणपूल तसेच नांदुरा बायपास आदी विकास कामांसाठी निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री गडकरी यांचे आभार मानले. पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी कर्जमाफी योजनेचा पैसा शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होत असून, जिल्हय़ात सर्वात जास्त मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग झाल्याचे सांगितले.सभेला मोठय़ा प्रमाणात गर्दी झाल्याने कोठारी विद्यालयाचे प्रांगण गर्दीने फुलले होते तर मैदान पूर्ण भरल्याने अनेकांनी मैदान बाहेर उभे राहून प्रमुख नेत्यांचे भाषण ऐकले. कार्यक्रमाचे संचालन महेश पांडे तर आभारप्रदर्शन पाटबंधारे विभागाचे अभियंता सुर्वे यांनी केले.

जिगाव पूर्ण करा, शेवटचे मागणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भाषणात मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती हे प्रत्येक वेळी माझ्या जिल्हय़ासाठी जिगाव प्रकल्पाला मोठा निधी देऊन तो जलदगतीने पूर्ण करा हे माझे शेवटचे मागणे असल्याचे वारंवार सांगत होते. चैनुभाऊ पाहा आता मोठा निधी तुमच्या प्रकल्पाला दिला आहे. हे सांगून आमदार संचेती यांनी या प्रकल्पासाठी करीत असलेल्या संघर्षाची माहिती दिली. - 

टॅग्स :buldhanaबुलडाणाChainsukh Sanchetiचैनसुख संचेती