शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

ज्ञानगंगेच्या पूराने तुटला पाच गावांचा संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 15:14 IST

पोरज गेरु-माटरगांव श्रीधर नगर सारोळा व दिवठाणा या गावांचा पूर स्थितीमुळे संपर्क तुटला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपोरज : दोन दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसाने ज्ञानगंगा नदीलापूर आला आहे. यामुळे खामगाव तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटला आहे. महिनाभरात निम्न ज्ञानगंगा प्रकल्प २, निमकवळा ओहरफ्लो फ्लो झाला आहे. पोरज गेरु-माटरगांव श्रीधर नगर सारोळा व दिवठाणा या गावांचा पूर स्थितीमुळे संपर्क तुटला आहे. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्यासह तहसिलदार शीतलकुमार रसाळ यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. निम्न ज्ञानगंगा प्रकल्प २ व निमकवळा प्रकल्प ओहरफ्लो फ्लो झाल्याने पोरज ज्ञानगंगा पाणलोट क्षेत्रात शेतकऱ्यांसह अनेक गावात नुकसान झाले आहे. पोरज गेरु-माटरगांव श्रीधर नगर सारोळा व दिवठाणा या गावांचा पूर स्थितीमुळे संपर्क तुटला आहे. दिवठाण्यातील घरांमध्ये ज्ञानगंगा प्रकल्पातील सांडव्याचे गावात पाणी घुसल्याने गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली. गत महिन्याभरापूर्वी सुद्धा ज्ञानगंगा प्रकल्प ओवरफ्लो झाला होता.प्रशासनाच्यावतीने ग्रामस्थांची समजूत काढून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप मदत मिळाली नाही. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी पाटबंधारे विभागाला दीड वर्षापूर्वीच सूचना दिल्या होत्या की दिवठाणा गावाचे पुनर्वसन लवकरात लवकर करण्यात यावे मात्र पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे गावाचे पुनर्वसन अपुरेच राहिले आहे असा आरोपही गावकरी करीत आहेत. पुरामुळे पूल पाण्याखाली गेला आहे. दिवठाणा गावातील सर्वच घरात सांडव्याचे पाणी घुसले आहे. ज्ञानगंगा प्रकल्पासाठी दिवठाणा या गावाचे काळेगाव फाट्या नजीक पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र शासनाकडून जागेचा मोबदला आणि पुनर्वसनासाठी असलेल्या सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावriverनदीfloodपूर