शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

एका महिन्यातच शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:28 IST

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या कामास वेग येण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. मोताळा तालुक्यातील लिहा बु. या गावाच्या सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन आपले गाव हगणदरीमुक्तीच्या वाटेवर नेले आहे. ऑगस्टमध्ये या गावाने शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या बेसलाइन सर्व्हेप्रमाणे ४१९ कुटुंबांचे हे मोठे गाव असतानाही गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांची एक मोट बांधून काम करीत आहेत. 

ठळक मुद्देसरपंच पाटील यांच्या प्रयत्नातून लिहा बु. हगणदरीमुक्तीच्या वाटेवर! इतर गावांनी आदर्श घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या कामास वेग येण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. मोताळा तालुक्यातील लिहा बु. या गावाच्या सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन आपले गाव हगणदरीमुक्तीच्या वाटेवर नेले आहे. ऑगस्टमध्ये या गावाने शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या बेसलाइन सर्व्हेप्रमाणे ४१९ कुटुंबांचे हे मोठे गाव असतानाही गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांची एक मोट बांधून काम करीत आहेत.  अजूनही लोकांना शौचालयाचे महत्त्व पटवून सांगावे लागते, ही शोकांतिकाच आहे; परंतु सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांच्यासारख्या पदाधिकार्‍यांनी ठरवल्यास  हे काम अशक्य नाही. स्वच्छता हा ग्रामविकासाचा कणा आहे, हे ओळखून सरपंचांनी यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. त्यामध्ये लाभार्थींच्या गृहभेटी घेणे, बैठका घेणे,  तसेच गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांना एकत्र करून या कामास गती देत आहेत. ४१९ कुटुंबांचे  हे मोठे गाव आहे. अद्याप २५४ एवढे शौचालये त्यांनी पूर्ण केले असून, ऑगस्टमध्ये शंभर या विक्रमी संख्येने त्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून घेतले. अजून त्यांच्याकडे १५४  शौचालये बांधकाम बाकी असून, येत्या महिनाभरात ते पूर्ण करण्याचे नियोजन त्यांनी केलेले आहे. यासाठी त्यांना ग्रामसेवक शीतल गवळी यांचे विशेष सहकार्य लाभत असून, ईश्‍वर पाटील, अनिल हरगड, गजानन सपकाळ, यांचाही सक्रिय  सहभाग लाभत आहे. तसेच गावाच्या तलाठी मंदा राठोड यांचाही मोलाचा सहभाग लाभत आहे. इतर सरपंचांनीही यांचा आदर्श घ्यावा, असे आदर्शवत सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील या स्वच्छ भारत मिशनसाठी काम करीत आहेत. लवकरच त्या गाव हगणदरीमुक्त करून एक आदर्श निर्माण करतील, याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

इतर गावांनी आदर्श घेण्याची गरजमोताळा तालुक्यातील लिहा बु. येथील ग्रामस्थांनी एका महिन्यात शंभर शौचालयांचे बांधकाम करण्याचा विक्रम केल्यामुळे परिसरात हगणदरीमुक्त गावाची चळवळ वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लिहा बु. गावाचे सर्वत्र कौतुक होत असून, जिल्ह्यातील इतर गावांनी या गावाचा आदर्श घेऊन आपले गाव हगणदरीमुक्त करून आदर्श गाव निर्माण करण्याचा चळवळीत भाग घेण्याची गरज आहे.