शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

एका महिन्यातच शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:28 IST

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या कामास वेग येण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. मोताळा तालुक्यातील लिहा बु. या गावाच्या सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन आपले गाव हगणदरीमुक्तीच्या वाटेवर नेले आहे. ऑगस्टमध्ये या गावाने शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या बेसलाइन सर्व्हेप्रमाणे ४१९ कुटुंबांचे हे मोठे गाव असतानाही गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांची एक मोट बांधून काम करीत आहेत. 

ठळक मुद्देसरपंच पाटील यांच्या प्रयत्नातून लिहा बु. हगणदरीमुक्तीच्या वाटेवर! इतर गावांनी आदर्श घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या कामास वेग येण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. मोताळा तालुक्यातील लिहा बु. या गावाच्या सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन आपले गाव हगणदरीमुक्तीच्या वाटेवर नेले आहे. ऑगस्टमध्ये या गावाने शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या बेसलाइन सर्व्हेप्रमाणे ४१९ कुटुंबांचे हे मोठे गाव असतानाही गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांची एक मोट बांधून काम करीत आहेत.  अजूनही लोकांना शौचालयाचे महत्त्व पटवून सांगावे लागते, ही शोकांतिकाच आहे; परंतु सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांच्यासारख्या पदाधिकार्‍यांनी ठरवल्यास  हे काम अशक्य नाही. स्वच्छता हा ग्रामविकासाचा कणा आहे, हे ओळखून सरपंचांनी यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. त्यामध्ये लाभार्थींच्या गृहभेटी घेणे, बैठका घेणे,  तसेच गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांना एकत्र करून या कामास गती देत आहेत. ४१९ कुटुंबांचे  हे मोठे गाव आहे. अद्याप २५४ एवढे शौचालये त्यांनी पूर्ण केले असून, ऑगस्टमध्ये शंभर या विक्रमी संख्येने त्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून घेतले. अजून त्यांच्याकडे १५४  शौचालये बांधकाम बाकी असून, येत्या महिनाभरात ते पूर्ण करण्याचे नियोजन त्यांनी केलेले आहे. यासाठी त्यांना ग्रामसेवक शीतल गवळी यांचे विशेष सहकार्य लाभत असून, ईश्‍वर पाटील, अनिल हरगड, गजानन सपकाळ, यांचाही सक्रिय  सहभाग लाभत आहे. तसेच गावाच्या तलाठी मंदा राठोड यांचाही मोलाचा सहभाग लाभत आहे. इतर सरपंचांनीही यांचा आदर्श घ्यावा, असे आदर्शवत सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील या स्वच्छ भारत मिशनसाठी काम करीत आहेत. लवकरच त्या गाव हगणदरीमुक्त करून एक आदर्श निर्माण करतील, याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

इतर गावांनी आदर्श घेण्याची गरजमोताळा तालुक्यातील लिहा बु. येथील ग्रामस्थांनी एका महिन्यात शंभर शौचालयांचे बांधकाम करण्याचा विक्रम केल्यामुळे परिसरात हगणदरीमुक्त गावाची चळवळ वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लिहा बु. गावाचे सर्वत्र कौतुक होत असून, जिल्ह्यातील इतर गावांनी या गावाचा आदर्श घेऊन आपले गाव हगणदरीमुक्त करून आदर्श गाव निर्माण करण्याचा चळवळीत भाग घेण्याची गरज आहे.