शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
5
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
6
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
7
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
8
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
9
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
10
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
11
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
12
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
13
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
14
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
15
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
16
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
17
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
18
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
19
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
20
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा

परवानगी नसताना केले पुलाचे बांधकाम

By admin | Updated: February 27, 2015 01:09 IST

मलकापूर येथे दोन किलोमीटरच्या परिसरात आठ पूल असतानाही नवव्या पुलाची निर्मिती.

विजय वर्मा / मलकापूर (जि. बुलडाणा): पाटबंधारे विभागाची परवानगी न घेताच येथील मोहनपुरा ते मदारटेकडीला जोडणार्‍या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे; मात्र आता हे बांधकाम तांत्रिक अडचणीत सापडल्याने बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन किमी. परिसराचे अंतरात आठ पूल असताना नवव्या नवीन पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे नगर परिषदेचा सुरू असलेला मनमानी कारभार समोर येत आहे. शहरातून वाहत जाणार्‍या नळगंगा नदीवर बोदवड पुलापासून ते रेल्वे पुलापर्यंत १ ते २ कि.मी. अंतरात पारपेठ, सालीपुरा, काशीपुरा या भागाशी संपर्क करण्याकरिता सध्या आठ पूल अस्तित्वात आहेत. असे असतानाही आणखी काही पूल निर्माण करण्याची योजना नगर परिषदने आखली आहे. नळगंगा नदीवर ५0 ते ६0 वर्षांपूर्वी फक्त चार पूल होते. पारपेठमध्ये वाहने जाण्यास मोठा व छोटा पूल निकामी असल्याने मोठय़ा पुलाच्या बाजूला नगराध्यक्षपदी विनयकुमार मुंधडा असताना एक लहान पुलाची निर्मिती तसेच सालीपुरा येथे जाण्यासाठी बारादरी ते सालीपुरा या पुलाची निर्मिती करण्यात आली होती; मात्र दोन्ही पुलावरून पावसाळ्याच्या दिवसात रहदारी करणे अशक्य आहे, तर मागीलवर्षी मंगलगेटवरून काशीपुरा व बोदवड रस्त्यावर जाण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातच नुकतेच छोट्या पुलाच्या १५ फूट अंतरावर छोटा बाजार ते पारपेठला जोडणार्‍या नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे, तर बडा हनुमान मंदिर ते पारपेठ व मोहनपुरा ते मदार टेकडीला जोडण्यात येणार्‍या नवीन पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे; मात्र त्याचे अंदाजपत्रक व नगर परिषदेच्यावतीने नवीन पुलाच्या निर्मितीसाठी सभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आलेले असल्याने भविष्यात या कामासाठी करोडो रुपये खर्च होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नगर परिषद प्रशासनाने मलकापूर येथील नळगंगा नदीही पाटबंधारे विभाग यांच्या अखत्यारित असतानासुद्धा त्या विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मलकापूर येथील नळगंगा नदीवर मोहनपुरा ते मदार टेकडी या भागात पूर्वी पुरातन काळातील छोट्या पुलाशेजारी लाखो रुपये खर्चुन ९ व्या पुलाचे निर्माण कार्य सुरु केले आहे. या पुलाअगोदर आठ पूल नदीपात्रात असतानासुद्धा कोणत्याही प्रकारची गरज नसताना या पुलाची निर्मिती नगर परिषद प्रशासन करीत आहे. नळगंगा नदीला पावसाळ्यात येणार्‍या पुराच्या पाण्याचा प्रवाह या पुलाच्या निर्मितीमुळे बदलून येणार्‍या पुराचे पाणी शहरात घुसून जनतेच्या आर्थिक व जीवित हानीस सामोरे जावे लागेल. त्यामुळे या पुलाच्या निर्मितीमागे खरा उद्देश कोणता, याच्या चौकशीची गरज व्यक्त होत आहे.