शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

परवानगी नसताना केले पुलाचे बांधकाम

By admin | Updated: February 27, 2015 01:09 IST

मलकापूर येथे दोन किलोमीटरच्या परिसरात आठ पूल असतानाही नवव्या पुलाची निर्मिती.

विजय वर्मा / मलकापूर (जि. बुलडाणा): पाटबंधारे विभागाची परवानगी न घेताच येथील मोहनपुरा ते मदारटेकडीला जोडणार्‍या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे; मात्र आता हे बांधकाम तांत्रिक अडचणीत सापडल्याने बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन किमी. परिसराचे अंतरात आठ पूल असताना नवव्या नवीन पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे नगर परिषदेचा सुरू असलेला मनमानी कारभार समोर येत आहे. शहरातून वाहत जाणार्‍या नळगंगा नदीवर बोदवड पुलापासून ते रेल्वे पुलापर्यंत १ ते २ कि.मी. अंतरात पारपेठ, सालीपुरा, काशीपुरा या भागाशी संपर्क करण्याकरिता सध्या आठ पूल अस्तित्वात आहेत. असे असतानाही आणखी काही पूल निर्माण करण्याची योजना नगर परिषदने आखली आहे. नळगंगा नदीवर ५0 ते ६0 वर्षांपूर्वी फक्त चार पूल होते. पारपेठमध्ये वाहने जाण्यास मोठा व छोटा पूल निकामी असल्याने मोठय़ा पुलाच्या बाजूला नगराध्यक्षपदी विनयकुमार मुंधडा असताना एक लहान पुलाची निर्मिती तसेच सालीपुरा येथे जाण्यासाठी बारादरी ते सालीपुरा या पुलाची निर्मिती करण्यात आली होती; मात्र दोन्ही पुलावरून पावसाळ्याच्या दिवसात रहदारी करणे अशक्य आहे, तर मागीलवर्षी मंगलगेटवरून काशीपुरा व बोदवड रस्त्यावर जाण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातच नुकतेच छोट्या पुलाच्या १५ फूट अंतरावर छोटा बाजार ते पारपेठला जोडणार्‍या नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे, तर बडा हनुमान मंदिर ते पारपेठ व मोहनपुरा ते मदार टेकडीला जोडण्यात येणार्‍या नवीन पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे; मात्र त्याचे अंदाजपत्रक व नगर परिषदेच्यावतीने नवीन पुलाच्या निर्मितीसाठी सभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आलेले असल्याने भविष्यात या कामासाठी करोडो रुपये खर्च होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नगर परिषद प्रशासनाने मलकापूर येथील नळगंगा नदीही पाटबंधारे विभाग यांच्या अखत्यारित असतानासुद्धा त्या विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मलकापूर येथील नळगंगा नदीवर मोहनपुरा ते मदार टेकडी या भागात पूर्वी पुरातन काळातील छोट्या पुलाशेजारी लाखो रुपये खर्चुन ९ व्या पुलाचे निर्माण कार्य सुरु केले आहे. या पुलाअगोदर आठ पूल नदीपात्रात असतानासुद्धा कोणत्याही प्रकारची गरज नसताना या पुलाची निर्मिती नगर परिषद प्रशासन करीत आहे. नळगंगा नदीला पावसाळ्यात येणार्‍या पुराच्या पाण्याचा प्रवाह या पुलाच्या निर्मितीमुळे बदलून येणार्‍या पुराचे पाणी शहरात घुसून जनतेच्या आर्थिक व जीवित हानीस सामोरे जावे लागेल. त्यामुळे या पुलाच्या निर्मितीमागे खरा उद्देश कोणता, याच्या चौकशीची गरज व्यक्त होत आहे.