शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

‘तो’ ठराव बेकायदेशीर असल्याचा काँग्रेसचा दावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:34 IST

खामगांव :   नगरपालिकेच्या सभेत वारंवार गैरवर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी बुधवारी पालिकेची खास सभा बोलाविण्यात आली.  या सभेत सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी ठराव पारित केले. सत्ताधा-यांनी बुधवारी पारित केलेला ठराव बेकायदेशीर असून, न्यायालयात टिकणार नाही, असा दावा काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले यांनी केला आहे.

ठळक मुद्देनगरसेवक गैरवर्तणूक प्रकरणभाजपवाल्यांनी केलेली शिफारस न्यायालयात टिकणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कखामगांव :   नगरपालिकेच्या सभेत वारंवार गैरवर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी बुधवारी पालिकेची खास सभा बोलाविण्यात आली.  या सभेत सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी ठराव पारित केले. सत्ताधा-यांनी बुधवारी पारित केलेला ठराव बेकायदेशीर असून, न्यायालयात टिकणार नाही, असा दावा काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले यांनी केला आहे.यासंदर्भात काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले, नगरसेवक तथा काँग्रेस शहर अध्यक्ष प्रवीण कदम, नगरसेवक अमेय सानंदा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले, की या सभेत काँग्रेस नगरसेवकांनी दिलेल्या उपसूचनेत सर्व कायदेशीर मुद्दे मांडण्यात आले आहे. या सभेत  उपसूचनेद्वारे काँग्रेस नगरसेवकांनी  अध्यक्ष व भाजपाच्या नगरसेवकांना कायदा दाखवून त्यांच्या कर्तव्याची जाण करून दिल्यानंतरदेखील असंविधानिक पद्धतीने, बेकायदेशीररीत्या व राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन नगराध्यक्ष अनिता डवरे व भाजपा नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर अधिकाराचा दुरुपयोग करून बेकायदेशीर ठराव मंजूर करून गैरवर्तन केले आहे व काँग्रेसच्या १२ नगरसेवकांविरुद्ध कलम ९२  अन्वये गैरवर्तन केल्याबद्दल त्यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा ठराव घेतला आहे. १५  जानेवारी २०१८ रोजीच्या महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक-४ मधील पोटकलम ८१ च्या खंड ‘ब’मध्ये नगराध्यक्षांनी घेतलेल्या विषयावर मुख्याधिकारी यांचा तपशीलवार अभिप्राय असणे आवश्यक आहे; पण उक्त विषयावर महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अन्वये गैरवर्तन या सज्ञेंतर्गत कोणत्या कृतीचा समावेश होतो, असा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे अध्यक्षांच्या निर्णयाविषयी स्पष्ट अभिप्राय देता येणार नाही, अशी टिप्पणी उक्त विषयावर मुख्याधिकारी यांनी दिल्यामुळे सत्ताधारी भाजपवाल्यांचे  हसे झाल्याचाही दावा काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे. याबाबत आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे नगरपालिकेतील काँग्रेसच्या पक्षनेत्या अर्चना टाले यांनी सांगितले. यावेळी  प्रवीण कदम, देवेंद्र देशमुख, अलकादेवी सानंदा, सरस्वती खासने, भूषण शिंदे, इब्राहिमखा सुभानखा,  शेख फारुख बिसमिल्ला, अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, नगरसेविका शीतल माळवंदे, संगीता पाटील, नगरसेविका शेख रेहानाबानो शेख मेहबुब हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

टॅग्स :khamgaonखामगावcongressकाँग्रेसMuncipal Corporationनगर पालिका