शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

‘तो’ ठराव बेकायदेशीर असल्याचा काँग्रेसचा दावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:34 IST

खामगांव :   नगरपालिकेच्या सभेत वारंवार गैरवर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी बुधवारी पालिकेची खास सभा बोलाविण्यात आली.  या सभेत सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी ठराव पारित केले. सत्ताधा-यांनी बुधवारी पारित केलेला ठराव बेकायदेशीर असून, न्यायालयात टिकणार नाही, असा दावा काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले यांनी केला आहे.

ठळक मुद्देनगरसेवक गैरवर्तणूक प्रकरणभाजपवाल्यांनी केलेली शिफारस न्यायालयात टिकणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कखामगांव :   नगरपालिकेच्या सभेत वारंवार गैरवर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी बुधवारी पालिकेची खास सभा बोलाविण्यात आली.  या सभेत सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी ठराव पारित केले. सत्ताधा-यांनी बुधवारी पारित केलेला ठराव बेकायदेशीर असून, न्यायालयात टिकणार नाही, असा दावा काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले यांनी केला आहे.यासंदर्भात काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले, नगरसेवक तथा काँग्रेस शहर अध्यक्ष प्रवीण कदम, नगरसेवक अमेय सानंदा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले, की या सभेत काँग्रेस नगरसेवकांनी दिलेल्या उपसूचनेत सर्व कायदेशीर मुद्दे मांडण्यात आले आहे. या सभेत  उपसूचनेद्वारे काँग्रेस नगरसेवकांनी  अध्यक्ष व भाजपाच्या नगरसेवकांना कायदा दाखवून त्यांच्या कर्तव्याची जाण करून दिल्यानंतरदेखील असंविधानिक पद्धतीने, बेकायदेशीररीत्या व राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन नगराध्यक्ष अनिता डवरे व भाजपा नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर अधिकाराचा दुरुपयोग करून बेकायदेशीर ठराव मंजूर करून गैरवर्तन केले आहे व काँग्रेसच्या १२ नगरसेवकांविरुद्ध कलम ९२  अन्वये गैरवर्तन केल्याबद्दल त्यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा ठराव घेतला आहे. १५  जानेवारी २०१८ रोजीच्या महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक-४ मधील पोटकलम ८१ च्या खंड ‘ब’मध्ये नगराध्यक्षांनी घेतलेल्या विषयावर मुख्याधिकारी यांचा तपशीलवार अभिप्राय असणे आवश्यक आहे; पण उक्त विषयावर महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अन्वये गैरवर्तन या सज्ञेंतर्गत कोणत्या कृतीचा समावेश होतो, असा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे अध्यक्षांच्या निर्णयाविषयी स्पष्ट अभिप्राय देता येणार नाही, अशी टिप्पणी उक्त विषयावर मुख्याधिकारी यांनी दिल्यामुळे सत्ताधारी भाजपवाल्यांचे  हसे झाल्याचाही दावा काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे. याबाबत आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे नगरपालिकेतील काँग्रेसच्या पक्षनेत्या अर्चना टाले यांनी सांगितले. यावेळी  प्रवीण कदम, देवेंद्र देशमुख, अलकादेवी सानंदा, सरस्वती खासने, भूषण शिंदे, इब्राहिमखा सुभानखा,  शेख फारुख बिसमिल्ला, अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, नगरसेविका शीतल माळवंदे, संगीता पाटील, नगरसेविका शेख रेहानाबानो शेख मेहबुब हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

टॅग्स :khamgaonखामगावcongressकाँग्रेसMuncipal Corporationनगर पालिका