शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात जमावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:03 IST

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत कोरोनाचा संसर्ग वाढला असून बुधवारीही १९९ जण कोरोेना बाधित आढळून आले आहेत. परिणामी, ही ...

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत कोरोनाचा संसर्ग वाढला असून बुधवारीही १९९ जण कोरोेना बाधित आढळून आले आहेत. परिणामी, ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सोबतच धार्मिक सण, उत्सवांवरही बंधने लादण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त मिरवणूक, रॅली काढण्यासही पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवजयंतीच्या मिरवणुका व रॅलींवरही आता निर्बंध आले आहेत. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हाधिकारी यांनी साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांना प्राप्त अधिकारांतर्गत हा आदेश काढण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारही दुपारी ४ नंतर बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. शहरी तथा ग्रामीण भागातही या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाणार असून पालिका मुख्याधिकारी व तालुका दंडाधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. पोलीस प्रशासनानेही यंत्रणेला त्या अनुषंगाने सहकार्य करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. एकंदरीत शहरी तथा ग्रामीण भागातही पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्रित येऊ नये, असे या आदेशाने स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी, जिल्ह्यात पोलीस व पालिका प्रशासनाकडून अनुषंगिक निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

--धार्मिक यात्रा, उत्सवांवरही निर्बंध--

जिल्ह्यात धार्मिक यात्रा, उत्सव, समारंभ, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभांवर निर्बंध लादण्यात आले असून, अशा कार्यक्रमांसाठी केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची मुभा राहणार आहे. याव्यतिरिक्त मिरवणुका, रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत यासंदर्भाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लग्न समारंभासाठीही ५० व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल.

--शैक्षणिक संस्थाही बंद--

सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थाही बंद करण्याच्या सूचना आहेत. ५वी ते ९वीचे वर्ग, खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, शिकवणी वर्ग २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. हॉटेल्स, दुकानांच्या पार्किंगमध्ये गर्दी होणार नाही, याची योग्य व्यवस्था संबंधितांनी करावी तथा मास्क सर्वांना अनिवार्य करण्यात आला आहे.

--दुपारी ४ नंतर आठवडी बाजार बंद--

जिलह्यातील सर्व आठवडी बाजार दुपारी ४ नंतर बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही याची पालिका, नगर पंचायत व ग्रामपंचायतींनी दक्षता घेण्यासोबतच गर्दी प्रतिबंधासाठी पथके नियुक्त करून आदेशाची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.