शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

परीक्षार्थ्यांचा गोंधळ

By admin | Updated: April 20, 2015 22:42 IST

बी.एड्.ची चुकीची प्रश्नपत्रिका दिली; विद्यापीठाचा भोंगळ कारभार.

बुलडाणा : विषयाचे नाव बरोबर लिहून चुकीचे प्रश्न लिहिलेली प्रश्नपत्रिका दिल्यामुळे बी.एड्. परीक्षार्थींनी येथील दोन परीक्षा केंद्रांवर २0 एप्रिल रोजी सकाळी दोन तास गोंधळ केला. ज्या विषयाचा अभ्यास झाला नाही, त्या विषयाची प्रश्न पत्रिका दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत होता. दरम्यान, पोलिसांनी रोष व्यक्त करणार्‍या जमावाला शांत केले. यावेळी परीक्षार्थींनी काही विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून झालेल्या गोंधळाची तक्रार प्राचार्य व परीक्षा केंद्र समन्वयक यांच्या माध्यमातून विद्यापीठाकडे पाठविली. बुलडाणा शहरातील जिजामाता महाविद्यालय व चिखली रस्त्यावरील कला महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. दरम्यान २0 एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान बी.एड्. परीक्षार्थींचा उदयोन्मूख भारतीय समाजातील शिक्षक आणि शिक्षण, हा पहिला पेपर होता. विद्यापीठाने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पहिला पेपरचा अभ्यास करून बी.एड्. परीक्षार्थी आ पल्या परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. सकाळी ९ वाजता पेपर सुरू झाल्यानंतर प्रश्न पत्रिका वाटण्यात आल्या; मात्र प्रश्नपत्रिकेवर विषयाचे नाव बरोबर होते; मात्र विचारण्यात आलेले प्रश्न २३ एप्रिल रोजी होणार्‍या शैक्षणिक मानसशास्त्र या विषयाचे होते. त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला व विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. सदर परिस्थिती शहरातील जिजामाता महाविद्यालय व कला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर निर्माण झाली होती. 

*१३ महाविद्यालयातील १२00 विद्यार्थ्यांना फटका

        बुलडाणा जिल्ह्यात १३ महाविद्यालये असून, त्यामधून १२00 विद्यार्थी बी.एड्च्या परीक्षेला बसले होते. आजच्या गोंधळामुळे या विद्यार्थ्यांना उदयोन्मूख भारतीय समाजातील शिक्षक आणि शिक्षण, हा पहिला पेपर आता ७ मे नंतर पुन्हा द्यावा लागणार आहे तर मानसशास्त्राचा २३ एप्रिल रोजी होणारा पेपर अमरावती विद्यापीठाला पुन्हा सेट करावा लागणार आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वेळा पत्रकाऐवजी दुसराच पेपर हातात आल्यामुळे विद्यार्थ्यांंना सोमवारी सकाळी मनस् ताप सहन करावा लागला.