शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

ढगफुटीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

चिखल तुडवत केली नुकसानीची पाहणी चिखली : अंबाशी, आमखेड, हिवरखेड, गांगलगाव, एकलारासह या भागात २८ जून रोजी ढगफुटी झाल्याने ...

चिखल तुडवत केली नुकसानीची पाहणी

चिखली : अंबाशी, आमखेड, हिवरखेड, गांगलगाव, एकलारासह या भागात २८ जून रोजी ढगफुटी झाल्याने पावसाने मोठा कहर केला. आमखेडचा पाझर तलाव फुटल्याने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. अंबाशीसह इतर गावांत देखील पाणी घुसल्याने अनेकांच्या घरांचेही नुकसान झाले. या महापुराने हजारो हेक्टर शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी २९ जून रोजी या भागात नुकसानीची पाहणी केली. चिखल तुडवत आणि पाण्यातून मार्ग काढत रविकांत तुपकरांनी या भागात पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून निघणारे आहे, शासनाने शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

रविकांत तुपकरांनी अंबाशी, आमखेड, हिवरखेड भागात ढगफुटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. परिस्थिती एवढी बिकट होती की, चिखल तुडवत, पाण्यातून आणि साचलेल्या गाळातून मार्ग काढत जावे लागले. रविकांत तुपकर पाहणीसाठी गेले असता शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी तुपकरांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

आमखेड येथील तलाव फुटला, अंबाशी येथील तलावाच्या भिंतीला तडा गेल्याने एका बाजूने भिंत खचली, गांगलगाव, बेराळा, एकलारा यासह इतर शिवारात ढगफुटीने नदी, नाल्यांमधील पाण्याने मार्ग सोडून शेतांचा रस्ता धरला. एकंदरीत या महापुराने दहा ते बारा गावांत प्रचंड नुकसान केले. हजारो हेक्टर शेतजमीन वाहून गेली, विहिरी खचल्या, स्प्रिंकलर सेट, पाइप, विहिरीतील मोटारी, बैलगाड्या आणि इतर साहित्य देखील वाहून गेले. शेतातील ५ ते सहा फुटाचा थर वाहून गेल्याने आता या जमिनी यावर्षी पुन्हा पेरणीसाठी तयार होऊ शकत नाहीत. शेतीच्या मशागतीसाठी लागलेला खर्च, कर्ज काढून पेरणीला लावलेला खर्च, बियाणे आणि खतांचा खर्च तर वाया गेलाच, शिवाय नव्याने जमिनीचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

यावेळी 'स्वाभिमानी'चे मयूर बोर्डे, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, रामेश्वर अंभोरे, अनिल वाकोडे, रामेश्वर परिहार, संतोष शेळके, अंबाशीचे सरपंच शिवानंद गायकवाड, विनोद देशमुख, नितीन देशमुख, गणेश भाकडे, प्रदीप वाघ, जयराम वाघ यांच्यासह गावकरी व 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला

झालेल्या नुकसानीची रविकांत तुपकर यांना माहिती देताना अनेक शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. एकाच दिवसात पिके होत्याची नव्हती झाली आणि जमिनीही खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत. यावेळी तुपकरांनी शेतकऱ्यांना धीर देत, या संकटाचाही धैर्याने सामना करण्याचे आवाहन केले. नुकसान भरपाईसाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडू, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.

प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत

आमखेड येथील तलावाच्या भिंतीवरील वनस्पती काढल्या असत्या तर ही भिंत अर्धी खचली नसती. कारण झाडांच्या मुळांनी ही भिंत पोखरली गेली. तसेच आमखेड तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याची गावकऱ्यांची मागणी होती. परंतु आवश्यक तशी भिंतीची उंची न वाढविल्याने व सांडवा नीट न काढल्याने हे धरण फुटले. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ त्या भिंतीची उंची वाढवून नव्याने भिंत बांधण्याचे काम तात्काळ हाती घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांच्या भिंतीवरील वनस्पती काढण्याचे काम दरवर्षी करणे गरजेचे आहे. अन्यथा असे प्रकार वारंवार घडतील, असे मत रविकांत तुपकरांनी व्यक्त केले.