शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

ढगफुटीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

चिखल तुडवत केली नुकसानीची पाहणी चिखली : अंबाशी, आमखेड, हिवरखेड, गांगलगाव, एकलारासह या भागात २८ जून रोजी ढगफुटी झाल्याने ...

चिखल तुडवत केली नुकसानीची पाहणी

चिखली : अंबाशी, आमखेड, हिवरखेड, गांगलगाव, एकलारासह या भागात २८ जून रोजी ढगफुटी झाल्याने पावसाने मोठा कहर केला. आमखेडचा पाझर तलाव फुटल्याने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. अंबाशीसह इतर गावांत देखील पाणी घुसल्याने अनेकांच्या घरांचेही नुकसान झाले. या महापुराने हजारो हेक्टर शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी २९ जून रोजी या भागात नुकसानीची पाहणी केली. चिखल तुडवत आणि पाण्यातून मार्ग काढत रविकांत तुपकरांनी या भागात पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून निघणारे आहे, शासनाने शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

रविकांत तुपकरांनी अंबाशी, आमखेड, हिवरखेड भागात ढगफुटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. परिस्थिती एवढी बिकट होती की, चिखल तुडवत, पाण्यातून आणि साचलेल्या गाळातून मार्ग काढत जावे लागले. रविकांत तुपकर पाहणीसाठी गेले असता शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी तुपकरांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

आमखेड येथील तलाव फुटला, अंबाशी येथील तलावाच्या भिंतीला तडा गेल्याने एका बाजूने भिंत खचली, गांगलगाव, बेराळा, एकलारा यासह इतर शिवारात ढगफुटीने नदी, नाल्यांमधील पाण्याने मार्ग सोडून शेतांचा रस्ता धरला. एकंदरीत या महापुराने दहा ते बारा गावांत प्रचंड नुकसान केले. हजारो हेक्टर शेतजमीन वाहून गेली, विहिरी खचल्या, स्प्रिंकलर सेट, पाइप, विहिरीतील मोटारी, बैलगाड्या आणि इतर साहित्य देखील वाहून गेले. शेतातील ५ ते सहा फुटाचा थर वाहून गेल्याने आता या जमिनी यावर्षी पुन्हा पेरणीसाठी तयार होऊ शकत नाहीत. शेतीच्या मशागतीसाठी लागलेला खर्च, कर्ज काढून पेरणीला लावलेला खर्च, बियाणे आणि खतांचा खर्च तर वाया गेलाच, शिवाय नव्याने जमिनीचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

यावेळी 'स्वाभिमानी'चे मयूर बोर्डे, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, रामेश्वर अंभोरे, अनिल वाकोडे, रामेश्वर परिहार, संतोष शेळके, अंबाशीचे सरपंच शिवानंद गायकवाड, विनोद देशमुख, नितीन देशमुख, गणेश भाकडे, प्रदीप वाघ, जयराम वाघ यांच्यासह गावकरी व 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला

झालेल्या नुकसानीची रविकांत तुपकर यांना माहिती देताना अनेक शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. एकाच दिवसात पिके होत्याची नव्हती झाली आणि जमिनीही खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत. यावेळी तुपकरांनी शेतकऱ्यांना धीर देत, या संकटाचाही धैर्याने सामना करण्याचे आवाहन केले. नुकसान भरपाईसाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडू, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.

प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत

आमखेड येथील तलावाच्या भिंतीवरील वनस्पती काढल्या असत्या तर ही भिंत अर्धी खचली नसती. कारण झाडांच्या मुळांनी ही भिंत पोखरली गेली. तसेच आमखेड तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याची गावकऱ्यांची मागणी होती. परंतु आवश्यक तशी भिंतीची उंची न वाढविल्याने व सांडवा नीट न काढल्याने हे धरण फुटले. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ त्या भिंतीची उंची वाढवून नव्याने भिंत बांधण्याचे काम तात्काळ हाती घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांच्या भिंतीवरील वनस्पती काढण्याचे काम दरवर्षी करणे गरजेचे आहे. अन्यथा असे प्रकार वारंवार घडतील, असे मत रविकांत तुपकरांनी व्यक्त केले.