शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

ढगफुटीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

चिखल तुडवत केली नुकसानीची पाहणी चिखली : अंबाशी, आमखेड, हिवरखेड, गांगलगाव, एकलारासह या भागात २८ जून रोजी ढगफुटी झाल्याने ...

चिखल तुडवत केली नुकसानीची पाहणी

चिखली : अंबाशी, आमखेड, हिवरखेड, गांगलगाव, एकलारासह या भागात २८ जून रोजी ढगफुटी झाल्याने पावसाने मोठा कहर केला. आमखेडचा पाझर तलाव फुटल्याने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. अंबाशीसह इतर गावांत देखील पाणी घुसल्याने अनेकांच्या घरांचेही नुकसान झाले. या महापुराने हजारो हेक्टर शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी २९ जून रोजी या भागात नुकसानीची पाहणी केली. चिखल तुडवत आणि पाण्यातून मार्ग काढत रविकांत तुपकरांनी या भागात पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून निघणारे आहे, शासनाने शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

रविकांत तुपकरांनी अंबाशी, आमखेड, हिवरखेड भागात ढगफुटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. परिस्थिती एवढी बिकट होती की, चिखल तुडवत, पाण्यातून आणि साचलेल्या गाळातून मार्ग काढत जावे लागले. रविकांत तुपकर पाहणीसाठी गेले असता शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी तुपकरांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

आमखेड येथील तलाव फुटला, अंबाशी येथील तलावाच्या भिंतीला तडा गेल्याने एका बाजूने भिंत खचली, गांगलगाव, बेराळा, एकलारा यासह इतर शिवारात ढगफुटीने नदी, नाल्यांमधील पाण्याने मार्ग सोडून शेतांचा रस्ता धरला. एकंदरीत या महापुराने दहा ते बारा गावांत प्रचंड नुकसान केले. हजारो हेक्टर शेतजमीन वाहून गेली, विहिरी खचल्या, स्प्रिंकलर सेट, पाइप, विहिरीतील मोटारी, बैलगाड्या आणि इतर साहित्य देखील वाहून गेले. शेतातील ५ ते सहा फुटाचा थर वाहून गेल्याने आता या जमिनी यावर्षी पुन्हा पेरणीसाठी तयार होऊ शकत नाहीत. शेतीच्या मशागतीसाठी लागलेला खर्च, कर्ज काढून पेरणीला लावलेला खर्च, बियाणे आणि खतांचा खर्च तर वाया गेलाच, शिवाय नव्याने जमिनीचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

यावेळी 'स्वाभिमानी'चे मयूर बोर्डे, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, रामेश्वर अंभोरे, अनिल वाकोडे, रामेश्वर परिहार, संतोष शेळके, अंबाशीचे सरपंच शिवानंद गायकवाड, विनोद देशमुख, नितीन देशमुख, गणेश भाकडे, प्रदीप वाघ, जयराम वाघ यांच्यासह गावकरी व 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला

झालेल्या नुकसानीची रविकांत तुपकर यांना माहिती देताना अनेक शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. एकाच दिवसात पिके होत्याची नव्हती झाली आणि जमिनीही खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत. यावेळी तुपकरांनी शेतकऱ्यांना धीर देत, या संकटाचाही धैर्याने सामना करण्याचे आवाहन केले. नुकसान भरपाईसाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडू, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.

प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत

आमखेड येथील तलावाच्या भिंतीवरील वनस्पती काढल्या असत्या तर ही भिंत अर्धी खचली नसती. कारण झाडांच्या मुळांनी ही भिंत पोखरली गेली. तसेच आमखेड तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याची गावकऱ्यांची मागणी होती. परंतु आवश्यक तशी भिंतीची उंची न वाढविल्याने व सांडवा नीट न काढल्याने हे धरण फुटले. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ त्या भिंतीची उंची वाढवून नव्याने भिंत बांधण्याचे काम तात्काळ हाती घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांच्या भिंतीवरील वनस्पती काढण्याचे काम दरवर्षी करणे गरजेचे आहे. अन्यथा असे प्रकार वारंवार घडतील, असे मत रविकांत तुपकरांनी व्यक्त केले.