शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

बदलते हवामान आणि शाश्वत शेतीवर साधला शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:26 IST

यावेळी कृषी हवामानतज्ज्ञ मनेश यदुलवार व कृषी हवामान निरीक्षक अनिल जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. जागतिक पातळीवर ...

यावेळी कृषी हवामानतज्ज्ञ मनेश यदुलवार व कृषी हवामान निरीक्षक अनिल जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. जागतिक पातळीवर होत असलेला हवामान बदल व त्याचा शेतीवर होत असलेला परिणाम याबाबत मनेश यदुलवार यांनी सखोल विचार मांडले. बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे जरुरीचे आहे, त्यासोबत जिल्हा कृषी हवामान केंद्राद्वारे विस्तारित करण्यात येत असलेली हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिका प्रत्येक शेतकऱ्याने समजून घ्यावी व तिचा शेती व्यवस्थापनात वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारत सरकारने भारतीय हवामान खात्याच्या साहाय्याने विकसित केलेले ‘मेघदूत व दामिनी’ ॲप शेतकऱ्यांच्या दैनंदिनीमध्ये हिताचे आहे, असे यदुलवार यांनी स्पष्ट केले. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नधान्याचा पुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामान साक्षर होऊन आपापल्या शेतीची उत्पादकता वाढविली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले. जिल्हा कृषी हवामान केंद्र हे कृषी विज्ञान केंद्राच्या फलाटाचा उपयोग करून हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला पत्रिका (तालुकानिहाय व पीकनिहाय) जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा पोहोचविते, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे योग्य व्यवस्थापन करता येते. जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या अचूक व योग्यवेळी सातत्याने प्रसारित व विस्तारित होणाऱ्या हवामान आधारित कृषी सल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते व ही शेती उत्पादनातील वाढ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय विकास दरात निश्चितच भर घालणारी ठरू शकते, असे मत मनेश यदुलवार यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव टोम्पे, संस्थापक अध्यक्ष पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी केले. या ऑनलाइन कार्यक्रमाचा जिल्ह्यातील व विदर्भातील प्रामुख्याने युवा शेतकरी व इतर शेतकरी बांधवांनी लाभ घेतला.