शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बदलते हवामान आणि शाश्वत शेतीवर साधला शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

यावेळी कृषी हवामानतज्ज्ञ मनेश यदुलवार व कृषी हवामान निरीक्षक अनिल जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. जागतिक पातळीवर ...

यावेळी कृषी हवामानतज्ज्ञ मनेश यदुलवार व कृषी हवामान निरीक्षक अनिल जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. जागतिक पातळीवर होत असलेला हवामान बदल व त्याचा शेतीवर होत असलेला परिणाम याबाबत मनेश यदुलवार यांनी सखोल विचार मांडले. बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे जरुरीचे आहे, त्यासोबत जिल्हा कृषी हवामान केंद्राद्वारे विस्तारित करण्यात येत असलेली हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिका प्रत्येक शेतकऱ्याने समजून घ्यावी व तिचा शेती व्यवस्थापनात वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारत सरकारने भारतीय हवामान खात्याच्या साहाय्याने विकसित केलेले ‘मेघदूत व दामिनी’ ॲप शेतकऱ्यांच्या दैनंदिनीमध्ये हिताचे आहे, असे यदुलवार यांनी स्पष्ट केले. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नधान्याचा पुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामान साक्षर होऊन आपापल्या शेतीची उत्पादकता वाढविली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले. जिल्हा कृषी हवामान केंद्र हे कृषी विज्ञान केंद्राच्या फलाटाचा उपयोग करून हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला पत्रिका (तालुकानिहाय व पीकनिहाय) जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा पोहोचविते, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे योग्य व्यवस्थापन करता येते. जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या अचूक व योग्यवेळी सातत्याने प्रसारित व विस्तारित होणाऱ्या हवामान आधारित कृषी सल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते व ही शेती उत्पादनातील वाढ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय विकास दरात निश्चितच भर घालणारी ठरू शकते, असे मत मनेश यदुलवार यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रणव टोम्पे, संस्थापक अध्यक्ष पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी केले. या ऑनलाइन कार्यक्रमाचा जिल्ह्यातील व विदर्भातील प्रामुख्याने युवा शेतकरी व इतर शेतकरी बांधवांनी लाभ घेतला.