शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

सर्वसामान्य व्यक्ती हाच सेवेचा केंद्रबिंदू - राजेंद्र जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 16:44 IST

Khamgaon Subdivisional Officer खामगाव येथील नवनियुक्त उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : मानवी जीवनात तळागाळातील आणि वंचितांच्या सेवेला परमोच्च स्थान आहे. समाजातील शेवटचा घटक सुखी झाला की, समाज सुखी हीच आनंदमयी जीवनाची पहिली पायरी होय आणि म्हणूनच आपले पहिले प्राधान्य वंचित आणि सामान्यांच्या सेवेसाठीच आतापर्यंत राहीले आहे. या पुढेही राहणार आहे. खामगाव येथील नवनियुक्त उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्याशी साधलेला संवाद...

कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत काय सांगाल?कोरोना या विषाणू संसर्गाने जगभर थैमान माजविले आहे. शासकीय कार्यालयातील कर्मचारीही या आजाराला बळी पडताहेत. खामगाव उपविभागीय कार्यालय त्याला अपवाद नाही. त्यामुळे कोरोना जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणीकडे आपले प्रामुख्याने लक्ष राहील.

खामगावातील भूखंड घोटाळ्यात अन्याय झालेल्यांना कसा न्याय द्याल?खामगाव येथील भूखंड घोटाळ्याबाबत आपण ऐकूण आहोत. परंतु, सद्यस्थितीत या घोटाळ्यासंबंधित फाईल आपण पाहल्या नाहीत. त्यामुळे याबाबत आताच निश्चित काही असे सांगता येणार नाही. मात्र, या घोटाळ्याशी संबंधित सर्वच फाईलींच्या आपण खोलात जाणार आहोत. यातील अनियमिततांवर कायदेशीर बाबी तपासून योग्य ती कारवाई करण्यासाठी आपण सदैव कटीबध्द आहोत.

भूखंड घोटाळ्यामुळे उपविभागाची राज्यात प्रतिमा मलिन झाली ?खामगावात गाजलेल्या भूखंड घोटाळ्यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असे म्हणता येणार नाही. काही चांगली कामेही या विभागात निश्चितच झाली आहेत. ज्या कुणी घोटाळा केला, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे. त्यामुळे आगामी काळात सकारात्मक आणि प्रामाणिकपणे सामान्यांना न्याय देण्यासाठीच आपले प्राधान्य राहील.

 समाजातील सर्वच दु:ख आपण एकाचवेळी नाहीशी करू शकत नाही. तेवढे सामर्थ्य कोणत्याही मनुष्यात नाही. परंतू सेवेला चांगल्या कर्माची जोड दिल्यास निश्चितच काही जणांच्या चेहºयावर आपण आनंद पसरवू शकतो. प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टीकोनातून अनेकांची दु:ख निश्चितच कमी होतात. खामगाव उपविभागातील समस्या कशा सोडविणार ?समस्या आणि संकटे कधीही एकटी येत नाहीत. त्याकेवळ खामगाव उपविभागातच आहेत, असेही नाहीत. शासकीय सेवेत सर्वत्रच समस्या आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू ठेवत, आपल्या कर्तव्याला प्रामाणिकपणे सामोरे गेलं की निम्या समस्या आपोआप सुटतात. उर्वरित समस्यांचा धैर्याने सामना करावा लागतो. त्यानंतर काही समस्या आपली पाठ सोडवितात. थोडक्यात सर्वांना समान न्याय हे तत्व अंगिकारत  समस्या सोडविण्यासाठी आपले प्राधान्य राहणार आहे. आपण या अगोदर खामगाव उपविभागात सेवा केली असल्याने येथील भौगोलिक परिस्थितीची तसेच जनसामान्यांची बºयापैकी माहिती आहे. त्याचा कामकाजात निश्चित फायदा होईल.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत