शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंदच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 11:57 IST

Buldhana News महाविद्यालये सुरू करता येणार नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवांना पाठविले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून बंद असलेली महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याची घोषणा राज्य शासनाने केली. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता याविषयी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये सुरू करता येणार नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवांना पाठविले आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली होती. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने टप्प्याटप्प्याने सुरुवातीला ९ ते १२पर्यंत व त्यानंतर ५ ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर महाविद्यालये सुरू करण्याविषयी चर्चा सुरू झाली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सावंत यांनी १५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली होती. तसेच याविषयी निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. बुलडाणा जिल्ह्यामध्ये १ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. तसेच कोविड-१९ या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत.  त्यामुळे सद्यस्थितीमध्ये असलेल्या परिस्थितीचा विचार करता  २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्वीप्रमाणेच सुरू असलेले ऑनलाइन वर्ग सुरू ठेवावे त्यानंतर जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करून महाविद्यालये प्रत्यक्ष उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. महाविद्यालय बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcollegeमहाविद्यालय