शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

संग्रामपूर येथे गोठय़ाला आग; दोन लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:57 IST

वरवट बकाल : संग्रामपूर येथील शेतातील गुरांच्या गोठय़ाला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजता घडली. या आगीत शेतीसाहित्य खाक झाले असून, एका म्हशीचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे शेतकर्‍याचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले.

ठळक मुद्देशेती साहित्य जळून खाक म्हशीचा होरपळून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : संग्रामपूर येथील शेतातील गुरांच्या गोठय़ाला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजता घडली. या आगीत शेतीसाहित्य खाक झाले असून, एका म्हशीचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे शेतकर्‍याचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले.तामगाव पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या संग्रामपूर शेतशिवारातील अल्प भूधारक शेतकरी ज्ञानेश्‍वर शंकर व्यवहारे, वासुदेव शंकर व्यवहारे व मनोहर शंकर व्यवहारे या तीन भावांनी गावात जागे अभावी शेतातच गुरांसाठी लहान गोठे तयार केले होते. या गोठय़ात एका म्हशीसह गुरांचा चारा व ठिबक सिंचनाच्या नळ्या आदी शेती साहित्य होते; मात्र शनिवारी दुपारी गोठय़ाला अचानक आग लागल्याने शेतीचे संपूर्ण साहित्य खाक झाले. या आगीत म्हशीचा होरपळून मृत्यू झाला. आग लागल्याची माहिती कळताच ग्रामस्थांनी आग विझवण्याकरिता गोठय़ाकडे धाव घेऊन प्रयत्न केले. आग विझविण्यासाठी जळगाव जामोद येथील अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले होते. तर आग उशिरा आटोक्यात आली. दरम्यान, तलाठी विनोद भिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना सादर केला. या घटनेमुळे शेतकर्‍याचे अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले   असल्याने शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान, घटनास्थळी तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार इंगळे यांनी कर्मचार्‍यांसह भेट दिली. 

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरfireआग