शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील समस्यांबाबत खुद्द मुख्यमंत्रीच घेणार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 17:44 IST

 बुलडाणा : समस्यांवर मात कर्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एप्रिल अखेर जिल्हा प्रशासनाची विशेष बैठक खुद्द मुख्यमंत्री घेतली, अशी ग्वाही नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी २८ मार्च रोजी विधानसभेत दिली.

ठळक मुद्देआ. हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक भूमिका घेत मांडलेल्या लक्षवेधी सुचनेच्या अनुषंगाने नगर विकास राज्यमंत्री डॉ. रंजीत पाटील यांनी हे आश्वासन दिले.नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधता असलेल्या बुलडाणा शहराची केल्या काही वर्षात वाताहत झाली आहे. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पाडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नाट्यगृहाचे दहा वर्षापासून बांधकाम रखडलेले आहे.

 बुलडाणा : पूर्व काळातील वैभव हरविल्यामुळे भकास झालेल्या व जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरातील समस्या सोडविण्याबाबत पालिका प्रशासनाची भूमिका कारणीभूत ठरली असल्याची कबूली देत या समस्यांवर मात कर्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एप्रिल अखेर जिल्हा प्रशासनाची विशेष बैठक खुद्द मुख्यमंत्री घेतली, अशी ग्वाही नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी २८ मार्च रोजी विधानसभेत दिली. दरम्यान, जिल्हा मुख्यालयाच्या विकासासाठी मुख्यमंत्री बैठकीपूर्वी रोडमॅप निश्चित करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. बुलडाणा शहरातील विविध समस्यांककडे राज्यशासनाचे लक्ष वेधत आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक भूमिका घेत मांडलेल्या लक्षवेधी सुचनेच्या अनुषंगाने नगर विकास राज्यमंत्री डॉ. रंजीत पाटील यांनी हे आश्वासन दिले. नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधता असलेल्या बुलडाणा शहराची केल्या काही वर्षात वाताहत झाली आहे. मुबलकर जलसाठा असताना नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सुमारे ८० किमीच्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पाडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नाट्यगृहाचे दहा वर्षापासून बांधकाम रखडलेले आहे. वीज देयकांचा नियमित भरणा होत नसल्याने शहरातील मुख्य मार्गावरील पथदिवे बंद आहेत. दिवसागणीक समस्यांमध्ये भर पडत असताना शासन मात्र उदासीन आहे. हे सर्व मुद्दे लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडले आणि नागरिकांच्या तीव्र भावना निदर्शनास आणून दिल्या.

 राज्यमंत्र्यांना धरले धारेवर 

गेल्या तीन वर्षात १४ तारांकीत प्रश्न, २ वेळा अर्धासात चर्चा, अनेक कपात सुचना, ५ वेळा बैठका अशा संसदयी आयुधांचा वापर केल्यानंतरही गृहराज्यमंत्र्याकडून गुळगुळीत शब्दांव्यतिरिक्त कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्याची जाणीव करून देत राज्यमंत्र्यांना आ. सपकाळ यांनी धारेवर धरले. राज्यपालांच्या अभिभाषणात शहराच्या विकासाबबात एका अक्षराचाही उल्लेख नसल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण न झाल्याने बुलडाणा शहराला जाणीवपूर्वक वेठीस धरून भेदभाव केल्या जात असल्याची संतप्त भावना व्यक्त करीत घोषणा नको निधी द्या, अशी मागणी आ. सपकाळ यानी सभागृहात केली. माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनीही या लक्षवेधीवर सहभागी होत सपकाळांच्या प्रामाणिक भूमिकेचे समर्थन केले. मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, वित्तमंत्री, उर्जामंत्री अशी महत्त्वाची खाती विदर्भाकडे असताना विदर्भातीलच बुलडाणा शहराला न्याय मिळत नसले तर हे शासनाचे अपयश असल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. सोबतच मुख्यमंत्र्यानीच समक्ष बैठ घेऊन लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली.

पालिका प्रशासनाची उदासिनता

विधीमंडळ पातळीवरील बैठखा निश्चितच पूर्ण समाधान देणार्या ठरल्या नसल्याची वस्तूस्थिती मान्यकरत शहराच्या समस्यांसाठी पालिका प्रशासनाची उदासिनता निश्चितच कारणीभूत ठरत असल्याची कबूलीच नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधीमंडळात दिली. यापूढे असे होऊ नये या करीता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालीच विशेष बैठक एप्रिल अखेर आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, बैठकीची विषय पित्रका आणि मुद्देनिहाय प्राधान्यक्रम व त्यावरील उपाययोजना सुद्धा निश्चित करून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी रोडमॅप ठरवू, असे नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDevendra Fadnvisदेवेंद्र फडणवीसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ