शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दारूचे दुकान बंद करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:22 IST

येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान बंद करण्यात  यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. सदर  मागणीस सरपंच, ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन  ठराव पारित करण्यात आला. सदर ठरावावर सह्यासुद्धा झाल्या  आहेत.

ठळक मुद्देमाटरगाव येथील ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांचा पाठिंबा; ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कमाटरगाव  : येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान बंद करण्यात  यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. सदर  मागणीस सरपंच, ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन  ठराव पारित करण्यात आला. सदर ठरावावर सह्यासुद्धा झाल्या  आहेत.माटरगाव येथे शासनमान्य देशी दारूचे दुकान असून, सदर  दुकानाच्या २00 फूट अंतरावरच जि.प.ची उर्दू शाळा आहे.  त्यामुळे शाळेमध्ये शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांवर याचा विपरी त परिणाम होत आहे. तसेच बाजूलाच मरी मातेचे मंदिर असून, ते थे दररोज सकाळ व संध्याकाळी भाविक भक्त दर्शनासाठी जातात.  त्यामुळे भाविक भक्तांना दारुड्यांचा त्रास सहन करावा लागतो.   देशी दारूच्या दुकानासमोर धर्मशाळा असून, सदर धर्मशाळेतसुद्धा  नेहमीच धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ इत्यादी कार्यक्रम होत  असतात. त्यामुळे महिलांनासुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो.   सदर दारू दुकानासमोर लोक नेहमी दारू पिऊन धिंगाणासुद्धा  घालतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणार्‍या लोकांनासुद्धा  त्रास होतो. तसेच दारूच्या या सवयीमुळे गावातील अनेकांचे संसार  उद्ध्वस्त झाले आहेत.  गावामध्ये दारूमुळे नेहमी वाद होऊन  बिकट परिस्थितीही निर्माण होत आहे. त्यामुळे येथील सरकारमान्य  देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामसभेत  ग्रामस्थांनी केली आहे. सदर मागणी महिला व पुरुषांच्यावतीने  करण्यात आली. त्याला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सकारा त्मक प्रतिसाद दिला व गावातून दारू ही कायमची हद्दपार व्हावी व  गावातील सर्व जनता ही सुखी समाधानाने नांदावी म्हणून याबाब तचा ठराव हा एकमताने मंजूर झाला आहे. सदर ठरावावर सूचक  राजेंद्र आळशी असून, अनुमोदन प्रकाश तायडे यांनी केले.सदर ठरावाच्या प्रती गृहराज्यमंत्री ना. रणजित पाटील, पालकमंत्री  ना.भाऊसाहेब फुंडकर, आमदार अँड. आकाश फुंडकर, मुंबई  पोलीस महासंचालक सतीश माथूर, जिल्हाधिकारी बुलडाणा,  विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती, जिल्हा पोलीस अधीक्षक  बुलडाणा, ठाणेदार जलंब आदींनासुद्धा पाठविलेल्या आहेत. 

युवकांमध्ये वाढत आहे व्यसनाधीनतेचे प्रमाणगावात दारूचे दुकान असल्यामुळे युवकांमध्येसुद्धा व्यसनाधीनतेचे  प्रमाण वाढत चालले असून, देशाचे भवितव्य समजली जाणारी  युवा पिढी व्यसनापायी बरबाद होत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण  झालेले आहे. सदर बाबीचा त्रास माता-भगिनींना मोठय़ा प्रमाणात  सहन करावा लागतो. त्यामुळे गावात दारू उपलब्ध होऊच नये,  अशी अपेक्षा सुज्ञ पालकवर्गाकडून व्यक्त केली जात असून,  त्यांच्याकडून दारूबंदीसाठी आग्रह धरला जात आहे.