शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दारूचे दुकान बंद करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:22 IST

येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान बंद करण्यात  यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. सदर  मागणीस सरपंच, ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन  ठराव पारित करण्यात आला. सदर ठरावावर सह्यासुद्धा झाल्या  आहेत.

ठळक मुद्देमाटरगाव येथील ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांचा पाठिंबा; ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कमाटरगाव  : येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान बंद करण्यात  यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. सदर  मागणीस सरपंच, ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन  ठराव पारित करण्यात आला. सदर ठरावावर सह्यासुद्धा झाल्या  आहेत.माटरगाव येथे शासनमान्य देशी दारूचे दुकान असून, सदर  दुकानाच्या २00 फूट अंतरावरच जि.प.ची उर्दू शाळा आहे.  त्यामुळे शाळेमध्ये शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांवर याचा विपरी त परिणाम होत आहे. तसेच बाजूलाच मरी मातेचे मंदिर असून, ते थे दररोज सकाळ व संध्याकाळी भाविक भक्त दर्शनासाठी जातात.  त्यामुळे भाविक भक्तांना दारुड्यांचा त्रास सहन करावा लागतो.   देशी दारूच्या दुकानासमोर धर्मशाळा असून, सदर धर्मशाळेतसुद्धा  नेहमीच धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ इत्यादी कार्यक्रम होत  असतात. त्यामुळे महिलांनासुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो.   सदर दारू दुकानासमोर लोक नेहमी दारू पिऊन धिंगाणासुद्धा  घालतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणार्‍या लोकांनासुद्धा  त्रास होतो. तसेच दारूच्या या सवयीमुळे गावातील अनेकांचे संसार  उद्ध्वस्त झाले आहेत.  गावामध्ये दारूमुळे नेहमी वाद होऊन  बिकट परिस्थितीही निर्माण होत आहे. त्यामुळे येथील सरकारमान्य  देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामसभेत  ग्रामस्थांनी केली आहे. सदर मागणी महिला व पुरुषांच्यावतीने  करण्यात आली. त्याला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सकारा त्मक प्रतिसाद दिला व गावातून दारू ही कायमची हद्दपार व्हावी व  गावातील सर्व जनता ही सुखी समाधानाने नांदावी म्हणून याबाब तचा ठराव हा एकमताने मंजूर झाला आहे. सदर ठरावावर सूचक  राजेंद्र आळशी असून, अनुमोदन प्रकाश तायडे यांनी केले.सदर ठरावाच्या प्रती गृहराज्यमंत्री ना. रणजित पाटील, पालकमंत्री  ना.भाऊसाहेब फुंडकर, आमदार अँड. आकाश फुंडकर, मुंबई  पोलीस महासंचालक सतीश माथूर, जिल्हाधिकारी बुलडाणा,  विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती, जिल्हा पोलीस अधीक्षक  बुलडाणा, ठाणेदार जलंब आदींनासुद्धा पाठविलेल्या आहेत. 

युवकांमध्ये वाढत आहे व्यसनाधीनतेचे प्रमाणगावात दारूचे दुकान असल्यामुळे युवकांमध्येसुद्धा व्यसनाधीनतेचे  प्रमाण वाढत चालले असून, देशाचे भवितव्य समजली जाणारी  युवा पिढी व्यसनापायी बरबाद होत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण  झालेले आहे. सदर बाबीचा त्रास माता-भगिनींना मोठय़ा प्रमाणात  सहन करावा लागतो. त्यामुळे गावात दारू उपलब्ध होऊच नये,  अशी अपेक्षा सुज्ञ पालकवर्गाकडून व्यक्त केली जात असून,  त्यांच्याकडून दारूबंदीसाठी आग्रह धरला जात आहे.