शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

गोहत्या बंद करून रामराज्य आणा

By admin | Updated: December 22, 2014 00:42 IST

सुवर्ण जयंती महोत्सव : बालयोगी सरस्वती यांचे आवाहन.

हिवराआश्रम (ता मेहकर, जि. बुलडाणा) : महाराष्ट्रात सर्वांत जास्त संत निर्माण झाले. संतांचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणात असूनदेखील आज महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात दुष्काळ पडताना दिसत आहे. याचे कारण गोहत्याचे प्रमाण; महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात आहे. गोहत्या बंद करुन रामराज्य आणा, असे आवाहन बालयोगी सरस्वती यांनी विश्‍व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंती महोत्सवादरम्यान केले.गोहत्यासंबंधीचे विचार आज संत महात्म्यांनादेखील मंचकावरून व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे. यासाठी गोवंश वाढवा, गौशाळा काढा. गोहत्या टाळल्यास येथील भूमी स्वर्ग बनेल, असेही बालयोगी सरस्वती यांनी सांगितले. हिवराआश्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात हिंदू संमेलनास जमलेल्या हजारो हिंदू बांधवांच्या समोर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष शुकदास महाराज होते, तर परम् श्रद्धेय बालयोगी सरस्वती, महामंडलेश्‍वर अखिलेश महाराज गिरी, दादासाहेब वेदक यांची प्रमुख उपस्थिती होती. धर्माचे रक्षण करा, धर्म आपले रक्षण करेल. आज धर्माच्या रक्षणार्थ कार्य करण्याची वेळ आली असून, आज धर्मांतर नाही, तर घर वापसी कार्य होत असल्याचे अखिलेश महाराज गिरी यांनी सांगितले. ५0 वर्षांपासून विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्याचा आढावा व धर्मासंदर्भात पुढील करावयाच्या कार्यासंबंधीचे विवेचन त्यांनी केले. गोरक्षणाच्या कार्याबद्दल मेहकर येथील विजय पवार यांचा बालयोगी सरस्वती यांच्या हस्ते तलवार भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील गावांतून सुमारे ५0 दिंड्यांनी आपली हजेरी लावली होती.