शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

वातावरणातील बदलामुळे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:25 IST

बिबी : वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या रब्बी हंगामातील ...

बिबी : वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत आहेत.

बिबी परिसरात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने रब्बी पिकांवर राेगराईचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे खरीपपाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. मागील काही दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण झाले हाेते, तसेच धुकेही पडल्याने रब्बी पिके धाेक्यात आली आहेत. वातावरणातील बदलामुळे तूर पिकांची फूलगळ होऊन अळीने आक्रमण केल्याने तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. आधीच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. आता रब्बी हंगामही सततच्या बदलामुळे, बदलत्या वातावरणामुळे धोक्यात आला आहे. तुरीचे उत्पादनही घटले असून, त्यात शेतातील सुडी गंजी पेटविण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. तुरीचे कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी जमा करण्यासाठी बिबी परिसरातील शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. बाेंडअळीमुळे कपाशीची लवकरच उलंगवाडी झाली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.