शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लिपिक,शिपाईपदाचा पेपर फुटला!

By admin | Updated: April 12, 2017 01:04 IST

बाजार समिती पदभरती प्रक्रिया : परीक्षार्थींसह स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांचा आरोप!

चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिपिक व शिपाई पदासाठी ९ एप्रिल रोजी पेपर घेण्यात आला होता; परंतु या भरती प्रक्रियेच्या सर्व प्रश्न पत्रिकेवर वेळ, गुण, एकूण प्रश्न यात पेनद्वारे खाडाखोड करण्यात आली असल्याने पेपर फुटल्याचा आरोप उमेदवारांसह स्वाभिमानीने केला असून, भरती प्रक्रिया पारदर्शकपणे घेण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थी उमेदवार व स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी १० एप्रिल रोजी केली आहे.चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिपिक व शिपाई पदासाठी ९ एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात आली आहे. भरती प्रक्रिया बाजार समिती व टेडरधारक कंपणीच्या माध्यमातून घेण्यात आली; परंतु सदर भरती प्रकियेदरम्यान केंद्र क्रमांक ३ वरील खोली क्रमांक ९ मध्ये शिपाई पदाच्या सर्व प्रश्न पत्रिकेवर वेळ, गुण, एकूण प्रश्न यावर पेनद्वारे खाडाखोड केल्याचे दिसून आल्याने या खोलीत गोंधळ झाला होता, तसेच उमेदवारांनी पेपर १५ मिनिट बंददेखील केला होता. यासंदर्भात विचारणा केली असता, लेखी तक्रार करा, आम्ही पेपर सेल तुमच्यासमोर फोडले आहे. यात आमचा काही संबंध नसल्याचे केंद्र प्रमुखांनी सांगितले, तसेच यासंदर्भात लेखी तक्रार करण्यास सांगितल्याने पेपर सुरू करण्यात आला होता; परंतु परीक्षार्थी उमेदवारांसमोर प्रश्नपत्रिकेचा सील तोडण्यात आला असला, तरी आतील सर्व प्रश्न पत्रिकेवर पेनद्वारे वेळ, एकूण गुण, एकूण प्रश्न यात खाडाखोड करण्यात आली असल्याने प्रश्नपत्रिका चाळण्यात आल्याचे स्पष्ट होते. तसेच लिपिक पदाच्या प्रश्नपत्रिकेवरील प्रश्न क्रमांक खोडून स्केच पेनने बदललेले आहे. याचा अर्थ सीलपॅक प्रश्न पत्रिका पाकिट फोडून परत पॅक केल्याचे निष्पन्न होत असल्याने तसेच प्रश्नपत्रिकेवर खाडाखोड करणे नियमाने गुन्हा आहे, तरी यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी व प्रामाणिक व गरीब कुटुंबातील व हुशार विद्यार्थी उमेदवारांचे नुकसान होऊ नये, याकरिता सदर पदाच्या जागेसाठी नव्याने पारदर्शकपणे भरती प्रक्रिया घेण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थी उमेदवारांसह स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे सचिव, पणन व कृषी राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे; तसेच आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांच्याशी चर्चा करण्यात येऊन याप्रकरणी योग्य कारवाई करून उमेदवारांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानीचे नितीन राजपूत, विनायक सरनाईक, दीपक सुरडकर, भरत जोगदंडे, गोपाल ढोरे पाटील, विलास तायडे, गजानन भणगे, सतीश देशमाने, प्रवीण साळवे यांच्यासह परीक्षार्थी उमेदवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे.