धाड : बुलडाणा तालुक्यातील बहूतांश गावांना अशुद्ध पाणीपुरवठा होतअसल्याचे वृत्त्त लोकमतने प्रकाशित करताच धाड ग्रामपंचायतीने दखल घेतपाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. धाडसह तेरा गावांना अधिग्रहीत विहिरीतून कोणत्याहीप्रकारे शुद्धीकरण नकरता सरळ पाणीपुरवठा करण्यात येतो. या अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळेनागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वृत्त प्रकाशित करताच सरपंचरिजवान सौदागर यांनी जलशुद्धीकरण करण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत.गावात येणारे पाणीशुद्ध करण्यासाठी शासनाने शुद्धीकरण यंत्र बसवावे अशीमागणी त्यांनी आ. राहूल बोंद्रे यांच्याकडे केली आहे. जिल्हाप्रशासनाकडेही मागणी केली आहे. आमदार निधी किंवा जिल्हा प्रशासनाकडूननिधी मिळाला नाही तर ग्रामपंचायत स्वखर्चाने जलशुद्धीकरण केंद्र सुरूकरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात होणार स्वच्छ पाण्याचा पुरवठा
By admin | Updated: March 29, 2017 15:35 IST