शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पाण्यासाठी नागरिकांचा खामगाव पालिकेत ठिय्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 17:40 IST

खामगाव : तब्बल २२ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत असल्याने, शहरातील भाटीया ले-आऊट आणि अयोध्या नगरातील नागरिकांनी शुक्रवारी पालिकेत धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : तब्बल २२ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत असल्याने, शहरातील भाटीया ले-आऊट आणि अयोध्या नगरातील नागरिकांनी शुक्रवारी पालिकेत धडक दिली. यावेळी पाणी पुरवठा विभागात ठिय्या देत, पाणी पुरवठा अभियंता, पर्यवेक्षक यांना नागरिकांना घेरावही घातला.

शहरातील भाटीया ले-आऊट आणि अयोध्या नगर भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी भेडसावत आहे. याबाबत पालिकेकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही संबंधितांकडून कोणतीही दखल घेण्यात येत नाही. गेल्या २२ दिवसांपासून परिसरात पाणी पुरवठा करण्यात आला नाही. गुरूवारी अनेक ठिकाणी पाणी मिळाले नाही. त्यामुळे संतत्प झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी दुपारी पालिकेत एका मोर्चाद्वारे धडक दिली. तात्काळ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. यावेळी काही जण संतप्त झाल्याने, काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, पाणी पुरवठा अभियंता प्राजक्ता पांडे यांनी नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी पर्यवेक्षक सुरेशसिंह ठाकूर, पवन गरड, नगरसेवक गणेश सोनोने आदींची उपस्थिती होती.

या आंदोलनात विजय राठोड, गजानन मिरगे, डिंगाबर भोंडेकर, विलास राऊत, कमल पवार, संजय बोंबटकर, आर.पी. जाधव, भूषण पवार, विजय इंगळे, संजय गिरजापूरे, रत्ना बयस, मधुकर बोराडे, अनिल राठी, दीपक देशमुख यांच्यासह परिसरातील महिला मोठ्यासंख्येने सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा