शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

महिला साहित्यावर रंगले विचार मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 16:23 IST

महिला साहित्यावर दिवसभर विचार मंथन रंगले. एकूण सहा सत्रात पार पडलेल्या या संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ताराबाई शिंदे साहित्य नगरीत पहिल्यांदाच राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन २५ आॅगस्ट रोजी घेण्यात आले. या साहित्य संमेलनात मराठीत खऱ्या अर्थाने स्त्रीवादाची मांडणी करणाºया ताराबाईशिंदे यांच्या दीडशे वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. महिला साहित्यावर दिवसभर विचार मंथन रंगले. एकूण सहा सत्रात पार पडलेल्या या संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात तब्बल पाच महत्त्वपूर्ण ठरावही घेण्यात आले.स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व प्रगती सार्वजनिक वाचनालय बुलडाणा यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन २०१९ घेण्यात आले. ताराबाई शिंदे यांच्या राजवाड्यापासून सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ वाजता सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री व लेखीका नीरजा ह्या होत्या. यावेळी स्वागत्याध्यक्षा डॉ. प्रभाताई चिंचोले, नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद, बुलडाणा अर्बन परिवाराच्या अध्यक्षा कोमल झंवर, प्रगती वाचनालयाच्या अध्यक्षा अरुणा कुल्ली यांची प्रामुख उपस्थिती होती.पहिल्या सत्रात प्रमुख पाहुण्यांचे व संमेलनाध्यक्ष नीरजा यांनी मार्गदर्शन केले. स्त्रीवादी विचारांच्या पुरस्कर्त्या ताराबाई शिंदे यांच्या शहरात हे साहित्य संमेलन असल्याने स्त्रीवादी लिखानावरही यावेळी चांगलीच चर्चा झाली. मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, सोयराबाई अशा संत कवयित्रींच्या साहित्यावरही या संमेलनातून प्रकाश टाकण्यात आला. संमेलनाच्या दुसºया सत्रात ‘आम्ही काय वाचतो, लिहीतो, बोलतो?’ हा विषय घेऊन टॉक शो घेण्यात आला. मुंबईच्या ज्योती आंबेकर आणि अमरावती येथील रजीया सुलताना या टॉक शोचे मुख्य आकर्षण होत्या.त्यानंतर ताराबाई शिंदे यांच्या स्त्रीवादी विचार भारतीय साहित्यात सशक्तपणे का व्यक्त होत नाही? यावर तिसरे सत्र रंगले. तिसºया सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे होत्या. चवथ्या सत्रामध्ये ‘पिंटी’ यावर एकपात्री प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील मुग्धा उमेश घेवरीकर या मुलीने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेषकांची मने जिंकली. सायंकाळी सहा वाजता पाचव्या सत्रामध्ये साहित्य संमेलनाचा समारोप झाला. यावेळी मराठी राज्यभाषा होण्यासाठी मराठी ब्लॉकलेखन यावर मोफत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच साहित्याच्या अनुषंगाने विविध प्रकारचे आठ ठरावही योवही घेण्यात आले. दिवसभर चाललेल्या वेगवेगळ्या सत्रातून महिला साहित्य, समाज जीवन, संस्कृती, परंपरा यावर प्रकाश टाकण्यात आला. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक