शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

महिला साहित्यावर रंगले विचार मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 16:23 IST

महिला साहित्यावर दिवसभर विचार मंथन रंगले. एकूण सहा सत्रात पार पडलेल्या या संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ताराबाई शिंदे साहित्य नगरीत पहिल्यांदाच राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन २५ आॅगस्ट रोजी घेण्यात आले. या साहित्य संमेलनात मराठीत खऱ्या अर्थाने स्त्रीवादाची मांडणी करणाºया ताराबाईशिंदे यांच्या दीडशे वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. महिला साहित्यावर दिवसभर विचार मंथन रंगले. एकूण सहा सत्रात पार पडलेल्या या संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात तब्बल पाच महत्त्वपूर्ण ठरावही घेण्यात आले.स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व प्रगती सार्वजनिक वाचनालय बुलडाणा यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन २०१९ घेण्यात आले. ताराबाई शिंदे यांच्या राजवाड्यापासून सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ वाजता सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री व लेखीका नीरजा ह्या होत्या. यावेळी स्वागत्याध्यक्षा डॉ. प्रभाताई चिंचोले, नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद, बुलडाणा अर्बन परिवाराच्या अध्यक्षा कोमल झंवर, प्रगती वाचनालयाच्या अध्यक्षा अरुणा कुल्ली यांची प्रामुख उपस्थिती होती.पहिल्या सत्रात प्रमुख पाहुण्यांचे व संमेलनाध्यक्ष नीरजा यांनी मार्गदर्शन केले. स्त्रीवादी विचारांच्या पुरस्कर्त्या ताराबाई शिंदे यांच्या शहरात हे साहित्य संमेलन असल्याने स्त्रीवादी लिखानावरही यावेळी चांगलीच चर्चा झाली. मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, सोयराबाई अशा संत कवयित्रींच्या साहित्यावरही या संमेलनातून प्रकाश टाकण्यात आला. संमेलनाच्या दुसºया सत्रात ‘आम्ही काय वाचतो, लिहीतो, बोलतो?’ हा विषय घेऊन टॉक शो घेण्यात आला. मुंबईच्या ज्योती आंबेकर आणि अमरावती येथील रजीया सुलताना या टॉक शोचे मुख्य आकर्षण होत्या.त्यानंतर ताराबाई शिंदे यांच्या स्त्रीवादी विचार भारतीय साहित्यात सशक्तपणे का व्यक्त होत नाही? यावर तिसरे सत्र रंगले. तिसºया सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे होत्या. चवथ्या सत्रामध्ये ‘पिंटी’ यावर एकपात्री प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील मुग्धा उमेश घेवरीकर या मुलीने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेषकांची मने जिंकली. सायंकाळी सहा वाजता पाचव्या सत्रामध्ये साहित्य संमेलनाचा समारोप झाला. यावेळी मराठी राज्यभाषा होण्यासाठी मराठी ब्लॉकलेखन यावर मोफत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच साहित्याच्या अनुषंगाने विविध प्रकारचे आठ ठरावही योवही घेण्यात आले. दिवसभर चाललेल्या वेगवेगळ्या सत्रातून महिला साहित्य, समाज जीवन, संस्कृती, परंपरा यावर प्रकाश टाकण्यात आला. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक