शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या अवकृपेचा ‘मिरची’ला फटका, शेतकऱ्यांनी तोडली मिरचीची झाडे

By विवेक चांदुरकर | Updated: January 5, 2024 17:08 IST

हजारो रुपये खर्च करून लागवड केलेली झाडे तोडून टाकावी लागत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

खामगाव : गत काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलाचा फटका मिरची पिकाला बसला आहे. मिरचीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने झाडे सुकत आहेत. त्यामुळे वानखेड भागातील शेतकरी मिरचीची झाडे उपटून काढून टाकत आहेत. हजारो रुपये खर्च करून लागवड केलेली झाडे तोडून टाकावी लागत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

जिल्ह्यात अनेक शेतकरी भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतात. वानखेड भागात अनेक शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली आहे. पेरणीसाठी हजारो रुपचे खर्च करण्यात आले. तसेच १५ ते २० वेळा औषध फवारणी करावी लागली; पण काहीच परिणाम झाला नसून रोग कायम आहे. सध्या मिरची पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मिरचीच्या रोपाच्या पानावर सुरकुत्या पडणे, चुरडा मुरडा होत आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विविध प्रकारच्या रासायनिक औषधींची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने मिरचीची झाडे तोडून फेकत आहेत.

पानांवर पडल्या सुरकुत्या

बुरशीजन्य रोगामुळे मिरचीच्या रोपांची पाने वाकडीतिकडी होऊन सुरकुत्या पडल्या आहेत. शिरेकडे मुरडते व शिरे जाड होऊन पानांचा रंग फिकट हिरवा पिवळसर होऊन चुरडली आहेत.

सध्या मिरची पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे झाडे सुकत आहेत. परिणामी, काही झाडे तोडून टाकण्यात येत आहेत. बुरशीजन्य रोग नियंत्रणात येण्याकरिता कोणत्या औषधांची फवारणी करावी, याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. - दीपक हागे, मिरची उत्पादक शेतकरी, वानखेड

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी