शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

निसर्गाच्या अवकृपेचा ‘मिरची’ला फटका, शेतकऱ्यांनी तोडली मिरचीची झाडे

By विवेक चांदुरकर | Updated: January 5, 2024 17:08 IST

हजारो रुपये खर्च करून लागवड केलेली झाडे तोडून टाकावी लागत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

खामगाव : गत काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलाचा फटका मिरची पिकाला बसला आहे. मिरचीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने झाडे सुकत आहेत. त्यामुळे वानखेड भागातील शेतकरी मिरचीची झाडे उपटून काढून टाकत आहेत. हजारो रुपये खर्च करून लागवड केलेली झाडे तोडून टाकावी लागत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

जिल्ह्यात अनेक शेतकरी भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतात. वानखेड भागात अनेक शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली आहे. पेरणीसाठी हजारो रुपचे खर्च करण्यात आले. तसेच १५ ते २० वेळा औषध फवारणी करावी लागली; पण काहीच परिणाम झाला नसून रोग कायम आहे. सध्या मिरची पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मिरचीच्या रोपाच्या पानावर सुरकुत्या पडणे, चुरडा मुरडा होत आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विविध प्रकारच्या रासायनिक औषधींची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने मिरचीची झाडे तोडून फेकत आहेत.

पानांवर पडल्या सुरकुत्या

बुरशीजन्य रोगामुळे मिरचीच्या रोपांची पाने वाकडीतिकडी होऊन सुरकुत्या पडल्या आहेत. शिरेकडे मुरडते व शिरे जाड होऊन पानांचा रंग फिकट हिरवा पिवळसर होऊन चुरडली आहेत.

सध्या मिरची पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे झाडे सुकत आहेत. परिणामी, काही झाडे तोडून टाकण्यात येत आहेत. बुरशीजन्य रोग नियंत्रणात येण्याकरिता कोणत्या औषधांची फवारणी करावी, याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. - दीपक हागे, मिरची उत्पादक शेतकरी, वानखेड

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी