शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

साखळी वसतीगृह अनियमितता प्रकरणी बालकल्याण समिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:32 IST

नियमांचा भंग करून मुला, मुलींनाही एकत्र ठेवण्यात येत असल्याचे बाल कल्याण समितीच्या निदर्शनास आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरालगतच्या साखळी येथील नंदनवन वसतीगृहामध्ये तपासणी दरम्यान आढळलेल्या अनेक अनियमितता तथा वसतीगृहातील मुलांना दिली जाणारी अयोग्य वागणूक पाहता जिल्हा बालकल्याण समितीने हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून सोमवारी या प्रकरणात प्रसंगी मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.दरम्यान, शनिवारी या वसतीगृहात बाल कल्याण समिती जिल्हा बालकल्याण समिती व चाईल्ड लाईनच्या पथकाने येथे तपासणी करत १८ मुलांची सुटका केली होती. सध्या ही मुले शासकीय बालगृहात आहेत. या मुलांना पोटभर जेवण न देणे, शौचालयाच्या खड्ड्यातील माती काढावयास लावणे यासह अन्य कामे मुलांकडून येथे करून घेतल्या जात होती. सोबतच सुमार दर्जाच्या सुविधा या मुलांना दिल्या जात होत्या. त्यासंदर्भाने झालेली तक्रार पाहता ही कारवाई करण्यात आलीहोती. छत्रछाया ह्युमन डेव्हलपेमेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून नंदनवन वसतीगृह चालविण्यात येत होते. अजय दराखे हे त्याचे काम पाहतात. विशेष म्हणजे येथे नियमांचा भंग करून मुला, मुलींनाही एकत्र ठेवण्यात येत असल्याचे बाल कल्याण समितीच्या निदर्शनास आले होते.दरम्यान, यासंदर्भात बाल कल्याण समिती आता पुढे कोणती पावले उचलणार आहे याबाबत विचारणा केली असता बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा उज्वला कस्तुरे यांनी सोमवारी या प्रकरणात आणखी एक कारवाई होण्याचे संकेत दिले आहेत. मात्र नेमकी काय कारवाई होणार याबाबतचा उलगडा त्यांनी केला नाही. त्यामुळे सोमवारी याप्रकरणात मोठी कारवाई होण्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे चार विशेष म्हणजे या संस्थेला बाल अधिनियम २०१५ नुसार अनाथ मुलांना ठेवण्याची कुठलीच मान्यता नसतानाही येथे चार अनाथ मुलेही आढळून आली आहेत.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणा