शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

चिखली पंचायत समितीच्या दोन सदस्यांचे जात प्रमाणपत्र रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:31 IST

चिखली: अकरा महिन्यांपूर्वी झालेल्या चिखली पंचायत समिती निवडणुकीपश्‍चात सभापती-उपसभापती निवडणुकीच्यावेळी झालेल्या प्रचंड गदारोळानंतर सत्तेत वाटेकरी असलेल्या काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांना उण्यापुर्‍या वर्षभराच्या आतच प्रशासनाने चांगलाच जोरदार झटका दिला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस-भाजपाला जोरदार झटका : पंचायत समिती वतरुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: अकरा महिन्यांपूर्वी झालेल्या चिखली पंचायत समिती निवडणुकीपश्‍चात सभापती-उपसभापती निवडणुकीच्यावेळी झालेल्या प्रचंड गदारोळानंतर सत्तेत वाटेकरी असलेल्या काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांना उण्यापुर्‍या वर्षभराच्या आतच प्रशासनाने चांगलाच जोरदार झटका दिला आहे. राखीव गणातून विजयी झालेल्या दोन सदस्यांनी निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्न सादर न केल्याने त्यांचे पं.स. सदस्यत्व रद्द झाल्याचे आदेश जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी पारित केले आहेत. सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांपैकी एक सदस्य काँग्रेसचा तर एक भाजपाचा असल्याने उभय पक्षांच्या पायाखालील वाळू सरकली असून, यामुळे पंचायत समितीच्या सत्तेचे गणित पुन्हा एकदा बिघडण्याचे संकेत असल्याने पं.स. वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ४ ऑगस्ट २0१६ च्या निर्णयानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १२-अ, ४२(६)(अ), ६७(७-अ) नुसार राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्यांनी ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणार्‍या सदस्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात यावी, अशी तरतूद आहे. त्यानुसार फेब्रुवारी २0१७ मध्ये पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत करवंड या राखीव गणातून विजयी झालेले गजानन बाळकृष्ण इंगळे व सवणा या राखीव गणातून निवडून आलेल्या शे. फरीदाबी नासेर या दोन सदस्यांनी शासन निर्णयानुसार सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांनी संबंधित विभागास दिला होता. त्यावरून जात प्रमाणपत्र सादर न करणार्‍या सदस्यांना अपात्रतेचे औपचारिक आदेश पारित करण्याच्या अधिकारानुसार जिल्हाधिकार्‍यांनी गजानन इंगळे व शे. फरीदाबी नासेर या दोन सदस्यांची  निवड रद्द केल्याचे आदेश पारित केले आहेत. या कारवाईने या दोन्ही सदस्यांना चांगलाच धक्का बसला आहे.     

सत्ता समीकरण बिघडण्याची शक्यता!एकूण १४ सदस्य संख्या असलेल्या चिखली पंचायत समितीमध्ये भाजपा ७, काँग्रेस ५, शेतकरी संघटना १ आणि शिवसेना १ असे पक्षीय बलाबल आहे. असे असताना १४ मार्च २0१७ रोजी पडलेल्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या एका सदस्याने गैरहजेरी दर्शविली तर शिवसेना व शेतकरी संघटनेने काँग्रेसला सहकार्य केल्याने सभापतीपद काँग्रेसकडे गेले तर उपसभापतीपद मोठय़ा गदारोळानंतर भाजपाच्या वाट्याला आहे. त्या पश्‍चात आता दोन सदस्यांचे पद रद्द झाल्याने पं.स. वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पद रद्द झालेल्या सदस्यांपैकी एक सदस्य काँग्रेसचा तर एक भाजपाचा असून, हे दोन्ही पक्ष कट्टर विरोधक असले तरी पंचायत समितीच्या सत्तेत वाटेकरी असल्याने दोघांनाही या सदस्य रद्दच्या आदेशाचा फटका बसण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मते सदस्यत्व रद्द झालेल्या दोन्ही पं.स. सदस्यांना घरी बसण्याची वेळ आल्यास पोटनिवडणुकीतून पंचायत समितीतील सत्तेची उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे या दोन सदस्यांमुळे पदारूढ सदस्यांचेही धाबे दणाणले आहे. तर राजकीयदृष्ट्या गेल्या वर्षभराच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याने यदाकदाचित पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लागल्यास ती नेमकी कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे मोठे औसुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :chikhali roadचिखली रोडbuldhanaबुलडाणा