शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

चिखली : थेट सरपंच निवडीत काँग्रेसने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:25 IST

चिखली: तालुक्यात प्रथम झालेल्या सरपंच पदाच्या थेट  निवडणुकीत चिखली तालुक्यात काँग्रेसने बाजी मारली असून,  निवडणूक झालेल्या तालुक्यातील २८ पैकी १७ ग्रामपंचयतींमध्ये  काँग्रेस प्रणित सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणण्यात  काँग्रेसला यश आले असून, निवडणुकीचे निकाल जाहीर  झाल्यानंतर गावोगावच्या नागरिकांचे जथ्थे व विजयी  उमदेवारांनी आमदार राहुल बोंद्रे यांची जनसेवा कार्यालयावर  भेट घेऊन जल्लोष साजरा केला.

ठळक मुद्देतालुक्यातील २८ पैकी १७ ग्रामपंचायतींवर दावाकव्हळा ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तालुक्यात प्रथम झालेल्या सरपंच पदाच्या थेट  निवडणुकीत चिखली तालुक्यात काँग्रेसने बाजी मारली असून,  निवडणूक झालेल्या तालुक्यातील २८ पैकी १७ ग्रामपंचयतींमध्ये  काँग्रेस प्रणित सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणण्यात  काँग्रेसला यश आले असून, निवडणुकीचे निकाल जाहीर  झाल्यानंतर गावोगावच्या नागरिकांचे जथ्थे व विजयी  उमदेवारांनी आमदार राहुल बोंद्रे यांची जनसेवा कार्यालयावर  भेट घेऊन जल्लोष साजरा केला. तालुक्यातील पाटोदा, कर तवाडी, आंधई, उंद्री, चंदनपूर, पेनसावंगी, कव्हळा,  मिसाळवाडी, रानअंत्री, बेराळा, गुंजाळा, सातगांव भुसारी,  किन्ही सवडत, वरखेड, भानखेड, मनुबाई व महिमळ या १६  गावाचे सरपंच पदाचे विजयी उमेदवार हे काँग्रेस प्रणित  असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले असून, वरील गावातील सर्व  विजयी सरपंच व सदस्यांनी ग्रामस्थांसह जनसेवा कार्यालयावर  येऊन आनंद साजरा केला. दरम्यान, गत काळात केंद्रात व  राज्यात असलेल्या भाजप सरकारकडून सर्वसामान्य जनतेला  वेठीस धरीत त्यांच्यावर लादलेली महागाई व भाववाढ,  निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनाला हरताळ फासत, सुरू  असलेला मनमानी कारभार, नोटाबंदी, जीएसटी, कर्जमाफी,  यासारखे ग्रामीण जनतेला उद्ध्वस्त करणारे निर्णय, यामुळे  ग्रामीण भागात भाजपाविषयी नाराजीचे वातावरण होते. त्याचाही  परिणाम या निवडणुकीत जास्तीत जास्त काँग्रेसचे उमेदवार  निवडून येण्यात झाल्याचे या निवडणुकीत दिसून आल्याची प्र ितक्रिया काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष कैलास खंदारे व  शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी यांनी दिली आहे. 

कव्हळा ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्वतालुक्यातील उंद्री आणि कव्हळा या ग्रामपंचायतीमध्ये दीर्घकाळ  भाजपचाच वरचष्मा राहिला आहे; परंतु काँग्रेसकडून उंद्रीमध्ये  भूमीमुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांना  पक्षात सामावून घेत आमदार राहुल बोंद्रे यांनी उमेदवारी दिली.   त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला व पहिल्यांदाच थेट  निवडणुकीतून तालुक्यातील मोठय़ा ग्रामपंचायतींपैकी एक  असलेली उंद्री ग्रामपंचायत काँग्रेस ताब्यात आली आहे.  त्याचबरोबर कव्हळा येथेही अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत ही  ग्रामपंचायत काँग्रेसने हस्तगत केली असून, ग्रामपंचायत सदस्य  पदाच्या निवडणुकीतही काँग्रेसनेच व्यापक यश संपादन केले  असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.