शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

चिखली : ‘बेटी बचाओ’ योजनेच्या नावाखाली फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 01:54 IST

चिखली शहर व तालुक्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेचे अर्ज भरून घेतल्या जात असून, यासाठी २0 ते ५0 रुपये उकळल्या जात  असल्याचा प्रकार सुरू असल्याने या बाबीची गंभीरतेने दखल घेऊन प्रशासनाने गोरगरीब व सामान्य नागरिकांची पिळवणूक थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअर्जासाठी लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सुरूच!

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेच्या नावाने राज्यातील लाखो गरिबांना गंडा घातल्याचा प्रकार यापूर्वीच उघडकीस आल्यानंतर महिला व बालविकास मंत्नालयाने अशी कोणतीही घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केलेले असतानासुद्धा सद्यस्थितीत चिखली शहर व तालुक्यात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेचे अर्ज भरून घेतल्या जात असून, यासाठी २0 ते ५0 रुपये उकळल्या जात  असल्याचा प्रकार सुरू असल्याने या बाबीची गंभीरतेने दखल घेऊन प्रशासनाने गोरगरीब व सामान्य नागरिकांची पिळवणूक थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरातील विविध प्रभागात तसेच तालुक्यातील अनेक गावात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेंतर्गत मुलींच्या नावाने अर्ज भरून घेतल्या जात असून, सोबत सदर मुलीच्या आधार कार्डचा नंबर तसेच बँक खाते क्रमांक आदी महत्त्वपूर्ण कागदपत्रांची झेरॉक्स प्रत, फोटो आदी घेऊन हे अर्ज भरल्या जात असून, यासाठी प्रत्येकी २0 ते ५0 रुपये फी आकारली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा अर्ज भरल्यानंतर मुलीच्या लग्नाच्यावेळी दोन लाख रुपये मिळणार असल्याची अफवा पसरविण्यात आल्याने गोरगरीब नागरिक यास बळी पडत असून, खातरजमा न करता अर्ज भरून देण्यासह महत्त्वाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्सप्रती अर्जासोबत दिल्या जात असल्याचे चित्र आहे. खरेच दोन लाख मिळणार असतील तर २0 ते ५0 रुपयांसाठी कशाला अधिक चौकशा करायच्या, या भावनेतून हा अर्ज भरून देण्यासाठी काही सुशिक्षित नागरिक देखील मागचा-पुढचा काही एक विचार न करता अर्ज भरून देत आहेत. विशेष बाब म्हणजे, गत नोव्हेबर, डिसेंबर मध्येच हे सर्व अर्ज बनावट असल्याचे सिद्ध झाले असून, याबाबत महिला व बालकल्याण मंत्रालयाने अशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोबतच याबाबत विविध वृत्तपत्रांत या अर्जांच्या नावाखाली होणारी फसवणूक उघड झालेली असताना राजरोसपणे फसवणुकीचा हा प्रकार सुरू असून, यामध्ये गोरगरिबांची पिळवणूक होत आहे. या अर्जासोबत आधार कार्डची झेरॉक्स प्रत, फोटो व बँक खात्याची इत्थंभूत माहिती देण्यात येत असल्याने कदाचित या दोन्हीही बाबींचा भविष्यात गैरवापर केला जाऊ शकतो, ही बाब संबंधित लक्षात घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

काय आहे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’  योजनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २0१५ रोजी या योजनेची घोषणा केली आहे. स्त्नी-भ्रूणहत्या थांबावी, मुलींना सुरक्षा व शिक्षण मिळावे, हा या योजने मागचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा पोस्टात  सुकन्या समृद्धी योजना हे खाते सुरू करता येते. यासाठी मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. या खात्यात सदर मुलीच्या आई- वडिलांनी किंवा पालकांनी वर्षभरात कमीतकमी एक हजार तर जास्तीत जास्त दीड लाख रूपये जमा करावयाचे आहेत. सदर खाते सुरूवात झाल्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी याची मुदत संपते. त्यानंतरच यातील रक्कम मिळू शकते; मात्न मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतर जमा रकमेच्या निम्मी रक्कम तिच्या उच्चशिक्षणासाठी किंवा लग्नासाठी काढता येते. सुरुवातीला या खात्यातील रकमेवर व्याजदर जास्त होता. सन २0१७-१८ साठी तो ८.४ टक्के एवढा निर्धारित करण्यात आला आहे. 

व्यापक जनजागृतीचा अभाव‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेच्या नावाने राज्यातील लाखो गरिबांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्रालयाने अशी कोणतीही घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करण्यासह ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमांतर्गत कोणतेही वैयक्तिक लाभ मिळत नाहीत किंवा कोणताही थेट रक्कम बँक खात्यांमध्ये वळती केली जात नाही, हे जाहिरातींच्या माध्यमातून बिंबवण्याचा प्रयत्न करण्याचे स्पष्ट केले होते; मात्र त्यानुसार व्यापक प्रमाणावर जनजागृती न झाल्याने नागरिकांची फसवणूक अद्यापही सुरूच आहे.

अशी योजना असती तर किती प्रपोगंडा झाला असता; मात्र अशी कुठलीही योजना नसल्याचे चौकशी अंती स्पष्ट झाले आहे. तथापि आपल्याकडेही या योजनेच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार सुरू असून, फसवणूक करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- मनिषकुमार गायकवाड, तहसीलदार, चिखली.

टॅग्स :buldhanaबुलडाणा