शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकारी पंत यांना खामगाव पालिका ‘नकोशी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:33 IST

खामगाव : प्रभारी मुख्याधिकारी अतुल पंत यांना खामगाव नगर पालिका ‘नकोशी’ असल्याचे दिसून येते. मुख्याधिकारी पदाचा प्रभार स्वीकारल्यापासून त्यांनी एकदाही पालिकेत भेट दिली नाही. परिणामी, खामगाव नगर पालिकेचे प्रशासकीय कामकाज चांगलेच ढेपाळल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देपालिकेचा कारभार ढेपाळला! 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : प्रभारी मुख्याधिकारी अतुल पंत यांना खामगाव नगर पालिका ‘नकोशी’ असल्याचे दिसून येते. मुख्याधिकारी पदाचा प्रभार स्वीकारल्यापासून त्यांनी एकदाही पालिकेत भेट दिली नाही. परिणामी, खामगाव नगर पालिकेचे प्रशासकीय कामकाज चांगलेच ढेपाळल्याचे दिसून येते.खामगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर ९ एप्रिलपासून दीर्घ रजेवर गेले आहेत. दीर्घ रजेवर जाण्यापूर्वी काही दिवस मुख्याधिकारी बोरीकर किरकोळ रजेवर होते. तथापि, गेल्या काही दिवसांपासून मुख्याधिकारी बोरीकर यांचे खामगाव पालिकेत मन रमत नसल्याची चर्चा असतानाच, अचानक ते महिनाभराच्या दीर्घ रजेवर गेले. त्यांच्या अनुपस्थितीत खामगाव नगर पालिकेचा पदभार शेगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांच्याकडे सोपविण्यात आला. मुख्याधिकारी पंत यांनी ९ एप्रिल रोजी खामगाव पालिकेचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यासाठी केवळ १0-१५ मिनीटे ते नगर पालिकेत आले. पदभार स्वीकारल्यानंतर सुटीचे दिवस सोडून आठ दिवस लोटले. मात्र, या आठ दिवसांच्या कालावधीत एकदाही मुख्याधिकारी पंत यांनी खामगाव पालिकेला भेट दिली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी पंत यांना खामगाव पालिका ‘नकोशी’ तर नाही ना? अशी चर्चा पालिका वतरुळात रंगत आहे. 

पदभार स्वीकारण्यावरून होती नाराजी !खामगाव पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर दीर्घ रजेवर गेल्यानंतर त्यांच्या रिक्त पदाचा प्रभार स्वीकारण्यास मुख्याधिकारी अतुल पंत शेवटच्या क्षणापर्यंत नाराज होते. त्यामुळे  खामगाव पालिकेच्या मुख्याधिकारी पदाची सुत्रे घेण्यास सुरूवातीपासूनच कोणतेही स्वायरस्य दाखविले नाही. वरिष्ठांच्या आदेशानंतर त्यांनी सुत्रे स्वीकारली मात्र, पदभार घेतल्यापासून ते पालिकेत फिरकलेच नसल्याने, अतुल पंत यांना खामगाव पालिका ‘नकोशी’ असल्याची चर्चा आहे.

यहा पे सब शांती शांती है!मुख्याधिकारी नसल्याने पालिकेत  येणार्‍यांची संख्या कमालिची रोडावली आहे. पालिकेत कुणीही फिरकत नसल्याने ‘यहा पे सब शांती शांती है!’ या ओळीचा प्रत्यय येत आहे. तथापि, कुणाचाही वचक नसल्याने कर्मचारीही सैरभैर झाल्याचे चित्र पालिकेत गेल्या आठ-दहा दिवसांपासून सतत दिसून येत आहे.

टॅग्स :khamgaonखामगाव