शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील एक हजार गावात पोहोचली परिवर्तनाची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:50 IST

धामणगाव बढे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या पुढील टप्प्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चार गावांचा समावेश झाला असून राज्यातील २२ जिल्ह्यातील ८७ गावे आता सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.

-  नविन मोदे

धामणगाव बढे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या पुढील टप्प्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चार गावांचा समावेश झाला असून राज्यातील २२ जिल्ह्यातील ८७ गावे आता सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दायित्व निधी एकत्र करून राज्यातील दुर्गम भागातील खेड्यांना शाश्वत विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनची स्थापना २ एप्रिल १९१७ रोजी करण्यात आली होती. प्रारंभी १२ जिल्ह्यातील २४८ दुर्गम गावात हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. आता त्याची व्याप्ती एक हजार गावांपर्र्यंत पोहोचली आहे.या अभियानामुळे राज्यातील दुर्गम भागातील सुमारे ३०० दुर्गम खेडी आज शाश्वत विकासाच्या मार्गावर आहेत. यात व्यक्ती केंद्रस्थानी मानत आरोग्य आरोग्य, शिक्षण, रोजगार, पायाभूत व मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी परीपूर्ण प्रयत्न केले जातात. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सिंदखेड, चिखलीतील हरणी व करवंड आणि शेगावमधील सांगवा या गावांचा त्यात समावेश केला गेला आहे. पुढील आठवड्यात ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनतंर्गत येथील कामांना प्रारंभ होईल. आतापर्यंत अभियानाला मिळालेले यश पाहता महाराष्टÑ व्हिलेज सोशल ट्रान्समिशन फाऊंडेशन या नावाने रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. उद्योगपती रतन टाटा, अभिनेता अमिताभ बच्चन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रसिध्द व्यक्ती या अभियानाशी जोडल्या गेलेले आहेत. राज्यातील १७ मोठे उद्योगसमूह या उपक्रमास मदत करत असून ३५० ग्रामदूत तथा मोठे अधिकारी अभियानात पूर्णवेळ काम करत आहेत.

३०० खेडी परिवर्तनाच्या वाटेवरअभियानातंर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळी गट ग्रामपंचायतीतंर्गत चिंचोली, जांभळी वाडी, मेहरबान नाईक तांडा या दुर्गम गावाचा कायापालट झाला. सद्दाम खान सारख्या ग्रामदुताच्या परिश्रमावर, प्रशासनाच्या मदतीने शाश्वत विकासाकडे ही खेडी वाटचाल करत आहेत. सिंदखेड (प्रजा) गावाने वाटर कप स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. अभियानात गावाची निवड झाल्याने ग्रामस्थांचा उत्साह दुणावला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रविण कदम यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना