शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पीक कर्ज वाटपाचे बँकांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 10:59 IST

Crop Loan News : येत्या काळात बँकांना पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातील ४१ हजार ६२२ शेतकऱ्यांना ३६९ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून एकूण उदिष्ठाच्या ते ते अवघे २८ टक्के आहे. त्यामुळे येत्या काळात बँकांनापीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे यावर्षी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या सुचनेनुसार गेल्या तीन वर्षाच्या उदिष्ठ पुर्तीच्या सरासरीच्या आधारावर जिल्ह्यास पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ दिलेले आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ मिळालेले आहे. त्यामुळे हे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ बँकांना पुर्ण करावेच लागणार असल्याचे चित्र आहे. कारण गेल्या वर्षी शेतकरी कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठही मोठ्या प्रमाणावर वाढले होते. तब्बल ३ लाख ६२ हजार २२८ शेतकऱ्यांना २ हजार ४६० कोटी ३५ लाख रुपयांचे उदिष्ठ देण्यात आले होते. त्यापैकी ४२ टक्के शेतकऱ्यांना ५१ टक्के पीक कर्जाची रक्कम वाटप करण्यात आली होती.यंदा पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठच कमी झाल्यामुळे बँकांकडून उदिष्ठाची पुर्तता करण्याच्या दृष्टीने प्रभावी प्रयत्न होण्याची गरज आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनीही गेल्या आठवड्यात बँकांकडून नेमके किती उदिष्ठ पुर्ण झाले याचा आढावा घेतला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुलडाण्यात आले असता या मुद्द्यावर त्यांनी आ. हर्षवर्धन सपकाळांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. दुसरीकडे दोन दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ जुलै पर्यंत बँकांनी शेतकऱ्यांना खरीपासाठीचा पीक कर्ज पुरवठा करावा, असे निर्देश दिलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता उपरोक्त बाब स्पष्ट झाली.

२० दिवसात १३६ कोटी वाटपबँकांनी पीक कर्ज वाटपाचा वेग वाढविण्यासंदर्भात हालचाली कराव्यात, अशा सुचनाही अग्रणी बँकेकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने गेल्या २० दिवसात १५ हजार १३६ शेतकऱ्यांना १३६ कोटी २४ लाख रुपयांचे बँकांनी कर्ज वाटप केले आहे.

जिल्ह्यात ४१ हजार ६२२ शेतकऱ्यांना ३६९ काेटी ५२ लाख रूपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. उद्दीष्टाच्या ३० टक्के शेतकऱ्यांच्या हातात पिक कर्जाची रक्कम पडली आहे. सर्व शेतकऱ्यांना पिककर्ज मिळले, या दृष्टीने आमचे नियाेजन असून पिककर्ज वाटपाचा वेगही वाढत आहे.- नरेश हेडाऊ, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बॅंक

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbuldhanaबुलडाणाbankबँकFarmerशेतकरी