शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

खचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीचे आव्हान

By admin | Updated: April 14, 2015 00:37 IST

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार; अधिका-यांचे दुर्लक्ष, अद्याप मदत नाही.

बुलडाणा : अतवृष्टीत खचलेल्या, बुजलेल्या विहिरी महात्मा गांधी रोजगार योजनेंतर्गत ३१ मेपर्यंत बांधून दुरुस्ती करणे शासनाने बंधनकारक केले आहे; परंतु प्रशासनाची कामाची गती पाहता ते पूर्ण होण्याची शक्यता फार कमी आहे. तर खचलेल्या विहिरींना अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यात विविध योजनेच्या माध्यमातून आतापर्यंंत २0 हजारांवर विहिरी घेण्यात आल्या आहेत. त्यात अकोला जिल्ह्या तील ९६, बुलडाणा जिल्ह्यातील ८६९ व वाशिम जिल्ह्यातील १ हजार ४६३ असा एकूण पश्‍चिम वर्‍हाडातील २ हजार ४२८ अतवृष्टीत खचलेल्या व बुजलेल्या विहिरींचा समावेश आहे. या विहिरींची डागडुजी करण्यासाठी २४ सप्टेंबर २00८ च्या शासन निर्णयाद्वारे शेतकर्‍यांना मदत करण्याचे निश्‍चित झाले होते; परंतु शेतकर्‍यांना मदत मिळाली नाही. १७ डिसेंबर २0१३ च्या दुसर्‍या शासन निर्णयानुसार राज्यात २0१३ मध्ये झालेल्या अतवृष्टीत खचलेल्या व बुजलेल्या विहिरींसंदर्भात कृषी व महसूल खात्याच्या अधिकार्‍यांनी संयुक्तरित्या पंचनामा करून निश्‍चिती करावी तसेच बुजलेल्या विहिरींची नोंद सातबारावरून कमी करण्याबाबत महसूल व वन विभागाने दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. खचलेल्या विहिरींसंदर्भातही कृषी व महसूल विभागाने संयुक्तपणे प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून अहवाल तयार करावा, असेही सांगण्यात आले होते. यामध्ये तलाठी व कृषी विभागाच्या प्रतिनिधीला संबंधित शेतकर्‍याच्या विहिरीवर जाणे बंधनकारक केले होते; परंतु संबंधित अधिकारी घटनास्थळी जाण्याचे टाळाटाळ करीत असून, शेतकर्‍यांना लेखी अर्ज करण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांची नावे सुटल्यामुळे रोष व्यक्त झाला. त्यानंतर शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत या विहिरींची पाहणी करून नेमके किती नुकसान झाले, हे निश्‍चित करून त्याची दुरुस्ती होणे बंधनकारक होते; परंतु असे होत नसल्याचे शासनाच्या लक्षात आल्यानंतर ५ जानेवारी २0१५ ला पुन्हा शासनाने एक नवीन आदेश काढला. यामध्ये या कामासाठी ३१ मे २0१५ पर्यंंत मुदतवाढ देण्यात आली आहे.