शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

खचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीचे आव्हान

By admin | Updated: April 14, 2015 00:37 IST

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार; अधिका-यांचे दुर्लक्ष, अद्याप मदत नाही.

बुलडाणा : अतवृष्टीत खचलेल्या, बुजलेल्या विहिरी महात्मा गांधी रोजगार योजनेंतर्गत ३१ मेपर्यंत बांधून दुरुस्ती करणे शासनाने बंधनकारक केले आहे; परंतु प्रशासनाची कामाची गती पाहता ते पूर्ण होण्याची शक्यता फार कमी आहे. तर खचलेल्या विहिरींना अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यात विविध योजनेच्या माध्यमातून आतापर्यंंत २0 हजारांवर विहिरी घेण्यात आल्या आहेत. त्यात अकोला जिल्ह्या तील ९६, बुलडाणा जिल्ह्यातील ८६९ व वाशिम जिल्ह्यातील १ हजार ४६३ असा एकूण पश्‍चिम वर्‍हाडातील २ हजार ४२८ अतवृष्टीत खचलेल्या व बुजलेल्या विहिरींचा समावेश आहे. या विहिरींची डागडुजी करण्यासाठी २४ सप्टेंबर २00८ च्या शासन निर्णयाद्वारे शेतकर्‍यांना मदत करण्याचे निश्‍चित झाले होते; परंतु शेतकर्‍यांना मदत मिळाली नाही. १७ डिसेंबर २0१३ च्या दुसर्‍या शासन निर्णयानुसार राज्यात २0१३ मध्ये झालेल्या अतवृष्टीत खचलेल्या व बुजलेल्या विहिरींसंदर्भात कृषी व महसूल खात्याच्या अधिकार्‍यांनी संयुक्तरित्या पंचनामा करून निश्‍चिती करावी तसेच बुजलेल्या विहिरींची नोंद सातबारावरून कमी करण्याबाबत महसूल व वन विभागाने दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. खचलेल्या विहिरींसंदर्भातही कृषी व महसूल विभागाने संयुक्तपणे प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून अहवाल तयार करावा, असेही सांगण्यात आले होते. यामध्ये तलाठी व कृषी विभागाच्या प्रतिनिधीला संबंधित शेतकर्‍याच्या विहिरीवर जाणे बंधनकारक केले होते; परंतु संबंधित अधिकारी घटनास्थळी जाण्याचे टाळाटाळ करीत असून, शेतकर्‍यांना लेखी अर्ज करण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांची नावे सुटल्यामुळे रोष व्यक्त झाला. त्यानंतर शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत या विहिरींची पाहणी करून नेमके किती नुकसान झाले, हे निश्‍चित करून त्याची दुरुस्ती होणे बंधनकारक होते; परंतु असे होत नसल्याचे शासनाच्या लक्षात आल्यानंतर ५ जानेवारी २0१५ ला पुन्हा शासनाने एक नवीन आदेश काढला. यामध्ये या कामासाठी ३१ मे २0१५ पर्यंंत मुदतवाढ देण्यात आली आहे.