शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

अर्थकारण रुळावर आणण्याचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:11 IST

अर्थकारणास प्रारंभ झाला असला तरी त्याची व्याप्ती वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गात अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे अर्थचक्र गतीमान करण्याच्या दृष्टीने आता पावले पडत असली तरी जिल्ह्याचे अर्थकारण रुळावर आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. अनलॉकदरम्यान काही प्रमाणात जिल्ह्यात आता अर्थकारणास प्रारंभ झाला असला तरी त्याची व्याप्ती वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने आता शासनाची पावले पडत असून लॉकडाऊन दरम्यान सर्वाधिक फटका बसलेल्या लघु व मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी अशा उद्योजकांना २० टक्के अतिरिक्त कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यासाठी अतिरिक्त कुठलेही तारण देण्याची गरज सुक्ष्म व लघू उद्योजकांना पडणार नाही, अशी तजबीज करण्यात आली आहे.दुसरीकडे आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत जिल्ह्यातील फेरीवाल्यांना एक जुलै पासून दहा हजार रुपयांच्या मर्यादेत बँकांनमार्फत त्वरित कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ११ पालिका आणि दोन नगरपंचायतीतंर्गत फेरीवाल्यांच्या नोंदी असून त्यांना आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रमाने कर्ज उपलब्ध करण्यात येणार असले तरी त्याची दहा हजार रुपयापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली आहे. मोबाईल बँकींगलाही यामध्ये चालना मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरीकडे जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी प्रधान असल्यामुळे खरीपाच्या हंगामात ४५२ कोटी २५ लाख रुपयांचे पीककर्ज आतापर्यं वाटप करण्यात आले आहे. त्याचा लाभ ५७ हजार ३७६ शेतकऱ्यांना झाला असून जिल्ह्याचे अर्थचक्र वृद्धींगत करण्यास याची मोठी मदत होणार आहे.

सुक्ष्म व लघू उद्योगाला मात्र फटकासुक्ष्म व लघू उद्योगाला मात्र लॉकडाऊनमुळे फटका बसला आहे. हातावर काम असलेल्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे अशांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. सोबतच रिकरींगच्या माध्यमातून होणारी बचतही थांबली आहे. त्यांना आता खºया अर्थाने उभारी देण्याची गरज आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र थोड्या कालावधीत ही स्थिती बदलेले, असा विश्वास सहकाराताली जाणकार तथा आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या बुलडाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

११ टक्के नागरिकांना ‘गरीब कल्याण’चा आधार!लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत जिल्ह्यातील तीन लाख ३१ हजार ९१ व्यक्तींच्या जनधन खात्यात मार्च, एप्रिल आणि जून महिन्याचे मिळून एकूण ५७ कोटी १६ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळेही जिल्हयाच्या अर्थकारणास सध्या बºयापैकी गती आलेली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था