शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

विदर्भ-मराठवाड्यात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी चक्का जाम - राजू शेट्टींची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 19:12 IST

१९ आॅक्टोंबरला विदर्भ-मराठवाड्या चक्का जाम आंदोलनाची हाक स्वाभीमानी शेतकरी संघटने संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दोन आॅक्टोबर रोजी बुलडाण्यात दिली.

ठळक मुद्दे विदर्भात आयोजित पहिल्या सोयाबीन-कापूस परिषदेमध्ये ते बोलत होते. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून सोयाबीन व भुईमूगाच्या पिकाचे भाव घसरल्याचे खा. राजू शेट्टी यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

बुलडाणा: विदर्भ-मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून, सोयाबीन-कापसाच्या भावासाठी दसऱ्याला शस्त्रपुजन करून दुसऱ्या दिवशी अर्थात १९ आॅक्टोंबरला विदर्भ-मराठवाड्या चक्का जाम आंदोलनाची हाक स्वाभीमानी शेतकरी संघटने संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी दोन आॅक्टोबर रोजी बुलडाण्यात दिली. विदर्भात आयोजित पहिल्या सोयाबीन-कापूस परिषदेमध्ये ते बोलत होते. दरम्यान, दाळवर्गीय शेती माल आणि सात लाख क्विंटल पामतेल आयात केल्याने देशाच्या परकीय गंगाजळीला फटका बसल्याने आर्थिक स्थिती दोलायमान झाल्यानेच डॉलच्या तुलनेत रुपया घसरला आहे.देशाच्या आर्थिक व्यवस्थेला मोदी सरकारने दोलायमान केल्यानेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून सोयाबीन व भुईमूगाच्या पिकाचे भाव घसरल्याचे खा. राजू शेट्टी यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये दोन आॅक्टोबर रोजी ही सोयीबन-कापूस परिषद आयोजित केली होती. यावेळी स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रा. डॉ. प्रकाश पोफळे, माजी मंत्री सुबोध मोहिते, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिता ढगे, चंद्रशेखर साळुंके, साईनाथ अण्णा, मारोती वर्हाडे, शर्मिला येवले, दामोधर इंगोले यांच्यासह अन्य उपस्थित होते. खा. राजू शेट्टी पुढे म्हणाले की, शेतकरी पीक विमा योजना ही शेतकर्यांचे नाव वापरून शासनाच्या तिजोरीवर टाकलेला दरोडा आहे. त्यामुळे ही योजना पंतप्रधान कॉर्पाेरेट योजना असून परदेशातून आयात केलेला माल आणि ही कॉर्पाेरेट योजना उद्योजकांच्या भल्यासाठीची योजना आहे. त्यामुळे देशासाठी हे मोदी निर्मित संकट आहे. पुढील काळात सत्ताधार्यांच्या पाठीत लाथ घालून त्यांना दूर ठेवा. विदर्भ-मराठवाड्यात सोयाबीन-कापूस परिषदेच्या माध्यमातून आता पश्चिम महाराष्ट्रातील ऊस व दुध आंदोलनाच्या धर्तीवर ही एक निर्णायक लढाई करण्याच्या तयारीत स्वाभीमानी शेतकरी संघटना आली असल्याचे खा. शेट्टी म्हणाले. विदर्भ-मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून सोयाबीन व कापसाला हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, सोयाबीनसह, बोंडअळीमुळे गेल्या वर्षी झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू करावेत, यासह विविध मागण्याांसाठी सिमोलंघनानंतर शेतकर्यांसाठी विदर्भ-मराठवाड्यात चक्का जाम करून सोयाबीन-कापसाच्या भावासाठीच्या निर्णायक लढ्यासाठी तयार रहावे, असे आवाहन त्यांनी केले. झेंडे बाजूला सारून शेतकर्यांनी एकजूट दाखवावी-तुपकर पश्चिम विदर्भाप्रमाणेच विदर्भातही शेतकर्यांनी त्यांच्या खांद्यावरील झेंडे बाजूला सारून कापूस-सोयाबीनच्या भावासाठी एकजूट दाखवावी. बुलडाण्याचे पाणी पळविण्याचा पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी घाट घालू नये. ते लोणीकर असतील तर आपण तुपकर आहोत. मुळातच बुलडाणा जिल्ह्याचा विकासदर कमी आहे. त्यात शेतकरी आत्महत्या होत असताना ही बाब योग्य नसल्याचे तुपकर म्हणाले. जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगही नाहीत. जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेलेल्या टेक्सटाईल पार्कचे पुढे काय झाले हे ही सत्ताधारी भाजपाने सांगावे, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRaju Shettyराजू शेट्टी