शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

 रस्त्यालगतच्या शेतांचीच केंद्रीय पथकाकडून पाहणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 15:32 IST

खामगाव आणि बुलडाणा तालुक्यातील रस्त्यालगतच्या शेतांचीच पाहणी या पथकाकडून करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत खरिपाच्या हंगामाची नासाडी केली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले. दरम्यान, जिल्ह्यातील खामगाव आणि बुलडाणा तालुक्यातील रस्त्यालगतच्या शेतांचीच पाहणी या पथकाकडून करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.केंद्रीय कृषी मंत्रालयातंर्गत असणाºया कापूस विकास संचालनालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ आर. पी सिंग यांचे पथक शनिवारी दुपारी बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाले. शनिवारी खामगाव तालुक्यातील खामगाव तालुक्यातील कोलोरी, टेंभूर्णा व सुटाळा तर बुलडाणा तालुक्यातील भादोला शिवारातील शेतामध्ये या पथकाने भेट दिली. दरम्यान, अगदी मुख्य रस्त्यावरील शेतांमध्येच या पथकाने पाहणी केल्याने, शेतकरी वर्गांमध्ये कमालिचा नाराजीचा सूर आहे. अतिशय धावता दौरा या पथकाने केल्याने केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा एक फार्स असल्याचा आरोप कॉं. जितेंद्र चोपडे यांनी केला.यावेळी या पथकासमवेत खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड आकाश फुंडकर, अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, खामगांवचे उपविभागीय कृषी अधिकारी पटेल, तहसीलदार शीतल रसाळ, तालुका कृषि अधिकारी गिरी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्भादोला येथील शेतात उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसिलदार शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे आदी उपस्थित होते.दरम्यान, आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या आणि वादळी पावसामुळे ४७८ कोटी रुपयांचे नुकसान झालले आहे. राज्य शासनाने जिल्ह्यास यापूर्वीच १३६ कोटी १३ लाख ९१ हजार रुपयांच्या आसपास मदत दिलेली आहे. मात्र राज्य शासनाकडून मिळालेली ही मदत तोकडी असल्यामुे जिल्हयातील शेतकरी तीव्र रोष व्यक्त करत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आलेल्या ओला दुष्काळ पाहणी पथकाने बुलडाणा जिल्ह्यात दाखल होते नुकसानाची पाहणी केली. मात्र रस्त्या लगतच्याच शेतात जात त्यांनी ही पाहणी केली आहे. त्याचा सध्या शेतकºयांमध्ये रोष आहे. केंद्र सरकाकडून अपेक्षीत मदत मिळेल अशी आस शेतकºयांना आहे. मात्र या धावत्या पाहणमुळे शेतकºयांत नाराजी आहे. (प्रतिनिधी)बाजार समितीमधील शेतमालाची पाहणी!जिल्ह्यात परतीचा व अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतमालाची प्रतवारीही घसरली आहे. अशा शेतमालाची पाहणी शनिवारी केंद्रींय पथकातील केंद्रीय कृषी मंत्रालयातंर्गत असणाºया कापूस विकास संचालनालयाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ आर. पी सिंग खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन केली. याप्रसंगी मुंग, सोयाबीन शेतमालाची प्रतवारी बघत संबंधित शेतकरी व अधिकाºयांकडून माहिती घेतली.

येथे केली पथकाने पाहणी!खामगाव तालुक्यातील कोलोरी येथील शेतकरी विशाल वामनराव घुले यांच्या शेतात जाऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पीकाची पाहणी केली. तसेच टेंभूर्णा येथील शेतकरी नरेश जगन्नाथ चौकसे यांच्या सोयाबीन व ज्वारी पीकाची, तर सुटाळा येथील शेतकरी शंकर संपत वानखेडे यांच्या शेतातील कापून ठेवलेल्या ज्वारी पीकाची पाहणी केली. भादोला येथील शंकरअप्पा दगडअप्पा चित्ते यांच्या शेतात सोंगूण सुडी मारलेल्या नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी डॉ.सिंग यांनी शेतकºयाशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली.

केंद्रीय पथकाने खामगाव तालुक्यातील रस्त्यालगतच्या तीन शेतांनाच भेटी दिल्यात. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत धावती भेट दिली. केंद्री पथकाचा पाहणी दौरा हा एक फार्स होता. कोणत्याही शेतकºयांचे समाधान या दौºयामुळे झाले नाही.- जितेंद्र चोपडेनेते, अखिल भारतीय किसान सभा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावagricultureशेती