शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

उमेदवारांना मिळणार केवळ सात दिवस

By admin | Updated: September 7, 2014 00:42 IST

उमेदवारांची दमछाक ; राजकीय पक्षांची होणार धावपळ

सिद्धार्थ आराख / बुलडाणाविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंंत उमेदवारांना यापूर्वी तब्बल २0 दिवसांचा अवधी मिळत होता. यावेळी निवडणूक आयोगाने हा कालावधी कमी करून केवळ सात दिवसांचाच ठेवण्याचे संकेत दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली, त्यामुळे अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांची व त्यांच्या पक्षांची चांगलीच धावपळ होणार आहे.निवडणुका जशा जवळ येतात, तसे राजकीय पक्षांतील उमेदवारांच्या तिकीट वाटपाचा प्रश्न जटिल बनत जातो. त्यामुळे आचारसंहिता लागू होऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंंंत बर्‍याच पक्षाचे उमेदवार जाहीर होत नाहीत. या प्रक्रियेसाठी तब्बल २0 दिवसांचा कालावधी मिळत असल्याने राजकीय पक्षही उमदेवारीचा निर्णय अखेरच्या टप्यात जाहीर करतात, या कालावधीमुळे उमेदवरांना लागणार्‍या कागदपत्राची पूर्तता करणे, कार्यकर्ते व तिकीट नाकारलेल्या इच्छुकांची नाराजी दूर करण्याचे काम राजकीय पक्ष करतात; मात्र यावेळी हा वेळ मिळणार नाही. ज्या दिवशी आचारसंहिता लागू होईल त्या तारखेपासून सात दिवसांच्या आत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख राहणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागताच राजकीय पक्षांना आपले उमेदवार जाहीर करून कामाला लागावे लागणार आहे. परिणामी उमेदवार व त्यांच्या पक्षाची चांगलीच धावपळ होणार आहे. दिवाळीसारखा मोठा उत्सव समोर असल्याने हा निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याची माहिती आहे.