शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

उमेदवारांना मिळणार केवळ सात दिवस

By admin | Updated: September 7, 2014 00:42 IST

उमेदवारांची दमछाक ; राजकीय पक्षांची होणार धावपळ

सिद्धार्थ आराख / बुलडाणाविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंंत उमेदवारांना यापूर्वी तब्बल २0 दिवसांचा अवधी मिळत होता. यावेळी निवडणूक आयोगाने हा कालावधी कमी करून केवळ सात दिवसांचाच ठेवण्याचे संकेत दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली, त्यामुळे अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांची व त्यांच्या पक्षांची चांगलीच धावपळ होणार आहे.निवडणुका जशा जवळ येतात, तसे राजकीय पक्षांतील उमेदवारांच्या तिकीट वाटपाचा प्रश्न जटिल बनत जातो. त्यामुळे आचारसंहिता लागू होऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंंंत बर्‍याच पक्षाचे उमेदवार जाहीर होत नाहीत. या प्रक्रियेसाठी तब्बल २0 दिवसांचा कालावधी मिळत असल्याने राजकीय पक्षही उमदेवारीचा निर्णय अखेरच्या टप्यात जाहीर करतात, या कालावधीमुळे उमेदवरांना लागणार्‍या कागदपत्राची पूर्तता करणे, कार्यकर्ते व तिकीट नाकारलेल्या इच्छुकांची नाराजी दूर करण्याचे काम राजकीय पक्ष करतात; मात्र यावेळी हा वेळ मिळणार नाही. ज्या दिवशी आचारसंहिता लागू होईल त्या तारखेपासून सात दिवसांच्या आत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख राहणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागताच राजकीय पक्षांना आपले उमेदवार जाहीर करून कामाला लागावे लागणार आहे. परिणामी उमेदवार व त्यांच्या पक्षाची चांगलीच धावपळ होणार आहे. दिवाळीसारखा मोठा उत्सव समोर असल्याने हा निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याची माहिती आहे.