शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

सावरगाव मार्गावर आठ दिवसांपासून बसेस बंद

By admin | Updated: July 18, 2016 02:27 IST

नांद्रा येथील प्रवाशांचे हाल, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.

नांद्रा (जि. बुलडाणा) : गेल्या आठ दिवसांपासून लोणार-सावरगाव रोडवरील बससेवा कायमस्वरूपी बंद झाल्याने या मार्गावरील प्रवाशांचे फार हाल होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.लोणार बसस्थानकांतर्गत येणार्‍या या मार्गावर सर्वात जास्त प्रवासी वाहतूक आहे. सावरगाव, टिटवी, पांग्रा हे जास्त लोकवस्ती असणारी गावे या रोडवर असून या व इतर गावांसह मराठवाड्यातील बर्‍याच गावांचा लोणारशी संपर्क येतो. या मार्गावर प्रवाशांची सतत गर्दी असते. शिवाय शिक्षणासाठी लोणारला जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा मोठय़ा प्रमाणात आहे; परंतु त्याप्रमाणात या मार्गावर बसफेर्‍या अपुर्‍या आहेत. त्यामुळे हय़ा मार्गावरील प्रवाशांची नेहमीच गैरसोय होत असते. आता तर आठ दिवसांपासून या रोडवरील सर्वच बसफेर्‍या बंद झाल्या आहेत. मुलीकरिता मानव विकासच्या दोन फेर्‍या तेवढय़ा येतात. त्यामुळे प्रवाशांची व विद्यार्थ्यांची फार गैरसोय होत आहे. पासेस असून खासगी वाहनातून प्रवास करावा लागत असल्याने त्यांना आर्थिक झळासुद्धा सोसावी लागत आहे. अनेक गरीब विद्यार्थ्यांनी तर पैशाच्या अडचणीमुळे शाळेत जाणेच बंद केले आहे. या संधीचा खासगी वाहनधारक चांगलाच फायदा घेत आहेत. कमीत कमी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बसची व्यवस्था करावी, अशी मागणी राजेश मोहिते, शिवाजी मुंढे, शिवाजी डोळे, केशव फुपाटे, यांच्यासह अनेक पालकांनी केली आहे.