शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

बसफेऱ्या बंद; महामंडळाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST

राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पसरत असलेल्या कोरोना विषाणूमुळे शहरातील बसस्थानकावर प्रवासी येत नाहीत. त्यामुळे अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागत ...

राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पसरत असलेल्या कोरोना विषाणूमुळे शहरातील बसस्थानकावर प्रवासी येत नाहीत. त्यामुळे अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. मेहकर आगार हे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न देणाऱ्या आगारातून एक समजले जाते. या आगारातून दररोज १२५ बसफेऱ्या सुरू असतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर बसफेऱ्या सुरू असतात. मात्र सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांकडून कोरोनाची भीतीने काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. प्रवाशांअभावी मेहकर तालुक्यातील अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. आगारात एकूण शंभराच्या वर एसटी बसगाड्या असून, अंदाजे सात ते आठ लाख रुपये प्रतिदिवस उत्पन्न या आगाराला मिळत होते. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांची कमतरता होत असल्याने एक लाखाच्या आत उत्पन्न होत असून, मोठ्या प्रमाणावर उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

महिन्याला ६० लाख रुपये खर्च

मेहकर आगारात एकूण ४८४ कर्मचारी वर्गावर अंदाजे दर महिन्याला ६० लाख रुपये खर्च करावा लागत आहे. या मेहकर आगारातील दर पंधरा दिवसांनी प्रत्येकी २० वाहक आणि चालक मुंबईला सेवा देण्यासाठी पाठविण्यात आले असून, येणाऱ्या सर्व चालक-वाहकांची तपासणीही करण्यात येत आहे. त्यातील अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.