शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वाहतूक पोलिसांवर अडीच लाख वाहनांचा भार

By admin | Updated: December 28, 2016 16:07 IST

रस्त्यावर अडीच लाख वाहने आणि वाहतूक नियंत्रण करणारे 194 मनुष्यबळ असल्याने वाहतूक व्यवस्था सुस्थितीत हाताळणे कठीण झाले आहे.

ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 28 - रस्ते आणि वाहनांच्या संख्या पाहता प्रचंड तफावत दिसून येते. दर दिवसाला रस्त्यावर शेकडो नवीन वाहने येत असताना वाहतूक नियंत्रण करणारे मनुष्यबळ मात्र तोकडेच आहे. रस्त्यावर अडीच लाख वाहने आणि वाहतूक नियंत्रण करणारे 194 मनुष्यबळ असल्याने वाहतूक व्यवस्था सुस्थितीत हाताळणे कठीण झाले आहे. 
 
शहरासह जिल्हाभरातील वाहतूक नियंत्रण करणारे अधिकारी आणि शिपायांची आकडेवारी ही बोटावर मोजण्याइतकी आहे.  परिणामी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. वाहने चालवण्याचा परवाना आरटीओंकडून दरदिवसाला दिला जात आहे. मात्र रस्त्यांची मर्यादा आणि दुर्दशेकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
 
जिल्हा वाहतूक शाखेत पोलीस निरीक्षकांसह एकूण 31 कर्मचारी कर्तव्यावर आहेत. याप्रमाणे शहर वाहतूक शाखेत एक पोलीस निरीक्षक आणि 11 कर्मचारी आहेत. याशिवाय जिल्ह्यातील 30 पोलीस स्टेशनमधील प्रत्येकी पाच याप्रमाणे 150 वाहतूक कर्मचारी आहे. अशा एकून 194 कर्मचा-यांवर अडीच लाखाच्या वर असलेल्या वाहनांवर ‘वॉच’ ठेवण्याची जबाबदारी आहे.
 
जिल्ह्यात धावतात 2,54,356 वाहने
 
मोटर सायकल 1,55,772 
स्कूटर 12,349
मोपेड 24377
मोटर केअर्स 7080 
जीप         4718
स्टेशन वॅगॉन 186 
टॅक्सी 1771 
ऑटोरिक्शा 13129
स्टेजकॅरेज 440 
मिनी बस        99
स्कूल बस         139
प्रायव्हेट सर्व्हिस वाहन 36
अॅम्ब्युलन्स 149
ट्रक आणि लॉरी         2730
टँकर  57
चारचाकी वाहन  3851 
तीन चाकी व्हॅन           3775
ट्रॅक्टर 14766
ट्रॅव्हल्स          8800
 इतर 133 
 
पोलिसांच्या संख्या तोकडी
जिल्ह्यात लाखो वाहन धावत असून वाहतूक पोलिसांची संख्या तोडकी आहे. वाहनांची संख्या वाढल्याने अपघातसुद्धा वाढले आहेत. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवल्यास वाहतुकीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळविता येऊ शकते - बी.डी फोन्दे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, बुलडाणा