शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

बुलडाणा : मिनी रोहित्रांवरून देणार कृषी पंपांना वीज पुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:06 IST

बुलडाणा: ऐन रब्बी हंगामात शेतकर्‍यांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त शेतकर्‍यांनी मलकापूरमधील जांबुळधाबा, चिखली तालुक्यातील केळवद येथील वीज उपकेंद्राच्या साहित्याचे नुकसान केल्याची घटना ताजी असतानाच आता शेतकर्‍यांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा, यासाठी प्रती दोन शेतकरी, एक मिनी वीज रोहित्र उपलब्ध करून दर्जेदार सुविधा देण्याच्या दृष्टीने वीज वितरण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देराज्यपातळीवर होणार सर्वेक्षण प्रती दोन शेतकरी, एक वीज रोहित्र 

नीलेश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ऐन रब्बी हंगामात शेतकर्‍यांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त शेतकर्‍यांनी मलकापूरमधील जांबुळधाबा, चिखली तालुक्यातील केळवद येथील वीज उपकेंद्राच्या साहित्याचे नुकसान केल्याची घटना ताजी असतानाच आता शेतकर्‍यांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा, यासाठी प्रती दोन शेतकरी, एक मिनी वीज रोहित्र उपलब्ध करून दर्जेदार सुविधा देण्याच्या दृष्टीने वीज वितरण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.यासंदर्भात राज्यस्तरावर लवकरच सर्वेक्षण होत असून, एचव्हीडीएस (हाय होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) अंतर्गत त्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्हय़ाचा १९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे आढावा घेतला होता. त्यावेळी शासन कृषी पंपांसाठी मिनी रोहित्र देणार असून, नवीन कृषी पंप वीज जोडण्या मिनी रोहित्रावरून देण्यात येतील, असे स्पष्ट केले होते. तूर्तास हा विषय प्राथमिक स्तरावर असला तरी राज्यस्तरावर त्यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात येऊन तशी अंमलबजावणी येत्या काळात केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. तूर्तास ही प्रक्रिया प्राथमिक स्तरावर असल्याचे सूत्रांनी सांगितले.बुलडाणा जिल्हय़ात गेल्या आठवडाभरापूसन खंडित वीज पुरवठय़ाने त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांनी जांबुळधाबा आणि केळवद येथील वीज उपकेंद्रासमोर आंदोलन करीत वीज उपकेंद्रातील साहित्याची जाळपोळ केली होती. या प्रकरणात चिखलीचे आ. राहुल बोंद्रे, मलकापूरचे नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांच्यासह जवळपास १९ जणांना पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. त्यातील दहा जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती तर आ. राहुल बोंद्रे यांची जमानतीवर सुटका करण्यात आली होती. त्यामुळे कृषी पंपांचा वीज पुरवठय़ाचा प्रश्न जिल्हय़ात ऐरणीवर आला होता. त्या पृष्ठभूमीवर माहिती घेतली असता ही बाब समोर आली. यासंदर्भातील कार्यवाही सध्या प्राथमिक स्तरावर असून, राज्यस्तरावर याबाबत सर्व्हे होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या बुलडाणा जिल्हा आढावा बैठकीदरम्यान, १९ डिसेंबर रोजी या मुद्दय़ावर माहिती देण्यात आली होती. त्यास वीज वितरण कंपनीचे बुलडाणा येथील अधीक्षक अभियंता जी. एम. कडाळे यांनीही दुजोरा दिला.

उच्चदाब वितरण तंत्रया तंत्राचा (एचव्हीडीएस) वापर करून अधिक व्होलटेज असलेल्या वाहिन्या टाकून लघुदाब वाहिन्यांची संख्या र्मयादित ठेवत शेतकर्‍यांना पुरेशी वीज देता येणे शक्य आहे. त्या दृष्टीने राज्यस्तरावर आता सर्व्हेक्षण करण्यात येणार असून, त्यानंतर शेतकर्‍यांना मिनी वीज रोहित्रावरून वीज दिली जाणार असल्याचे वीज वितरणमधील सूत्रांनी सांगितले. यामुळे वीज हानी रोखण्यास मदत मिळणार असून, कृषी पंपांनाही सुरळीत पुरवठा केला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. वीज रोहित्र फेल्युवर होण्याचे बुलडाणा जिल्हय़ाचे प्रमाण साडेआठ टक्के  आहे.

कृषी पंप वीज जोडणी अंतिम टप्प्यातजिल्हय़ातील कृषी पंपांची वीज जोडणी अंतिम टप्प्यात आली असून, २0१६ मधील प्रलंबित वीज जोडण्या लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे १९ हजार प्रलंबित असलेल्या कृषी पंपांच्या जोडण्या पूर्ण करण्यात आल्या असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. जून २0१८ पर्यंत सर्व प्रलंबित वीज जोडण्या दिल्या जाणार आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीWaterपाणी